शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक : गोपीचंद

By admin | Updated: October 24, 2016 04:19 IST

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक असते, असे मत माजी दिग्गज बॅडमिंटनपटू व आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावित इतिहास

नागपूर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक असते, असे मत माजी दिग्गज बॅडमिंटनपटू व आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावित इतिहास घडविणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे मार्गदर्शक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. रविवारी आयोजित एसजेएएन-रायसोनी अचिव्हर्स वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून ते नागपुरात आले होते. त्या वेळी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. सन २००१मध्ये आॅल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावित प्रकाश पदुकोणनंतर अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेले गोपीचंद म्हणाले, ‘‘खेळाडू घडविणे सोपे नसते. यश मिळवण्यासाठी सर्व स्तरांतून समर्पण असणे आवश्यक असते. खेळाडू, प्रशिक्षक, पालक या सर्वांच्या समर्पणासोबत परमेश्वराची कृपा असणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास पी. व्ही. सिंधूच्या आईने रेल्वेतील नोकरीचा त्याग केला आणि आॅलिम्पिकपूर्वी तिच्या वडिलांनी मुलीच्या मदतीसाठी दोन महिन्यांची रजा घेतली.’’गोपीचंद यांनी सांगितले, ‘‘भारतात प्रतिभेची वानवा नाही. खेळाडूंना सुविधा मिळाल्या आणि त्यांनी मेहनत घेतली तर अनुकूल निकाल मिळवता येतील.’’हैदराबादमध्ये विश्व दर्जाची अकादमी चालविणारे गोपीचंद पुढे म्हणाले, ‘‘२००८पासून भारताचा बॅडमिंटनचा आलेख सतत उंचावत आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये खेळाडू चांगले निकाल देत आहेत. सिंधूने आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकाविल्यानंतर भारतीय बॅडमिंटनचे चित्र पालटण्यास मदत झाली आहे. सध्या भारतीय बॅडमिंटन चांगल्या स्तरावर आहे.’’पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी गोपीचंद यांनी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रशंसा करताना सांगितले, ‘‘दर्जेदार खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी तळागाळातील खेळाडूंसाठी काही योजना राबविणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सातत्याने खेळांवर बोलत असतात. त्यांचा क्रीडा क्षेत्रात चांगला प्रभाव पडला. खेळाच्या विकासासाठी काही चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. काही कॉर्पोरेट खेळाच्या विकासासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत असून, हे चांगले चित्र आहे.’’विदेशी प्रशिक्षकाच्या मुद्यावर बोलताना गोपीचंद म्हणाले, ‘‘विदेशी प्रशिक्षकांसाठी काही मापदंड ठेवण्यात आलेले नाहीत. दीर्घ काळाचा विचार करता देशातच दर्जेदार प्रशिक्षक घडविणे आवश्यक आहे.’’ (क्रीडा प्रतिनिधी)