शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

विराटच्या चातुर्यामुळे तिसऱ्या पंचांना बदलावा लागला निर्णय

By admin | Updated: February 13, 2017 19:54 IST

कर्णधारपद स्वीकारल्यापासून विराट कोहली दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगल्भ होत आहे. त्याची फलंदाजी बहरत असतानाच प्रत्येक सामन्यात त्याचे

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 13 -  कर्णधारपद स्वीकारल्यापासून विराट कोहली दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगल्भ होत आहे.  त्याची फलंदाजी बहरत असतानाच प्रत्येक सामन्यात त्याचे नेतृत्वगुणही समोर येत आहेत. आज आटोपलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीतही विराटच्या नेतृत्वातील चातुर्य पाहायला मिळाले. विराटच्या त्या चातुर्यामुळे पंचांनाही आपला निर्णय बदलावा लागला.  
बांगलादेशने कालच्या 3 बाद 103 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर भारताच्या गोलंदाजांनी  झटपट विकेट काढत संघाला विजयासमीप पोहोचवले. तस्किन अहमद आणि कमरूल इस्लाम रब्बी ही बांगलादेशची अखेरची जोडी मैदानात होती. त्यावेळी अश्विनने टाकलेल्या 101 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तस्किन अहमद झेलबाद असल्याचे अपील भारतीय क्षेत्ररक्षकांनी केले. त्यावेळी निर्णय देण्यासाठी मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. मात्र रिप्लेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाण्यापूर्वी जमिनीला लागल्याचे दिसल्याने पंचांनी तस्किन नाबाद असल्याचा निर्णय दिला. 
पण पंचांनी रिप्लेमध्ये फक्त झेल आहे की नाही तेच पाहिले. फलंदाज पायचीत होता की नाही हे तपासले नाही. त्यामुळे विराटने पायचीतसाठी दाद मागितली. मग पुन्हा रिप्ले पाहिल्यावर फलंदाज पायचीत असल्याचा निर्णय पंचांनी दिला. त्याबरोबरच बांगलादेशचा डाव गुंडाळत भारताने सामना जिंकला.