शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

विराटने ऐनवेळी घेतला होता फिल्डिंगचा निर्णय

By admin | Updated: June 22, 2017 12:09 IST

टीम मीटिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करण्यावर एकमत झालं असतानाही विराट कोहलीने मैदानावर ऐनवेळी निर्णय बदलत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत पाकिस्तानने केलेला दारुण पराभव भारतीयांच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. भारतीय संघाच्या इतक्या खराब कामगिरीवर सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहे. मात्र या पराभवामागे कर्णधार विराट कोहलीने ऐनवेळी घेतलेला निर्णय असल्याचं बोललं जात आहे. टीम मीटिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करण्यावर एकमत झालं असतानाही विराट कोहलीने मैदानावर ऐनवेळी निर्णय बदलत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा नेमका हाच निर्णय संघाच्या पथ्यावर पडला, आणि एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
(कुंबळेची विकेट काढली, कोहली आता करून दाखव !)
(‘विराट’ वाद; कुंबळेला विरोध करणाऱ्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवा)
(प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा बीसीसीआयचा निर्णय)
 
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीचा हा निर्णय ऐकताच प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आश्चर्याचा धक्काच बसला. विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर कुंबळेने विराटकडे याबद्दल विचारणा केली. यावर विराट कोहलीने उलट उत्तर दिलं. यामुळे भारतीय संघामधील वातावरण बिघडलं, आणि त्याचा परिणाम खेळावर पहायला मिळाला. ज्यामुळे अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला. 
 
याआधी जेव्हा सुरुवातीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला होता, तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी करत 319 धावा केल्या होत्या. यानंतर मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला भारतीय संघाने 164 धावांवर ऑल आऊट केलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची ढिसाळ फलंदाजी पाहता अंतिम सामन्यात एक मोठी धावसंख्या उभारली असती, तर त्याचा पाठलाग करणं त्यांना कठिण गेलं असतं.
 
यामुळेच भारतीय संघ व्यवस्थापनाने अंतिम सामन्यात टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विराटने निर्णयाला बगल देत प्रथम गोलंदाजी करत असल्याचं जाहीर करुन टाकलं. उरली सुरली कसर विराट कोहलीने कुंबळेला उलट उत्तर देत भरुन टाकली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडलं, ज्याचा परिणाम खेळावर झाला. 
 
अंतिम सामन्यात फखर जमानने केलेल्या शतकाच्या आधारे पाकिस्तानने 338 धावांचा डोंगर उभा केला होता. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानने फक्त 158 धावांत गारद केलं, आणि 180 धावांनी दणदणीत पराभव केला.