शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

विराटने ऐनवेळी घेतला होता फिल्डिंगचा निर्णय

By admin | Updated: June 22, 2017 12:09 IST

टीम मीटिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करण्यावर एकमत झालं असतानाही विराट कोहलीने मैदानावर ऐनवेळी निर्णय बदलत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत पाकिस्तानने केलेला दारुण पराभव भारतीयांच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. भारतीय संघाच्या इतक्या खराब कामगिरीवर सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहे. मात्र या पराभवामागे कर्णधार विराट कोहलीने ऐनवेळी घेतलेला निर्णय असल्याचं बोललं जात आहे. टीम मीटिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करण्यावर एकमत झालं असतानाही विराट कोहलीने मैदानावर ऐनवेळी निर्णय बदलत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा नेमका हाच निर्णय संघाच्या पथ्यावर पडला, आणि एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
(कुंबळेची विकेट काढली, कोहली आता करून दाखव !)
(‘विराट’ वाद; कुंबळेला विरोध करणाऱ्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवा)
(प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा बीसीसीआयचा निर्णय)
 
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीचा हा निर्णय ऐकताच प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आश्चर्याचा धक्काच बसला. विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर कुंबळेने विराटकडे याबद्दल विचारणा केली. यावर विराट कोहलीने उलट उत्तर दिलं. यामुळे भारतीय संघामधील वातावरण बिघडलं, आणि त्याचा परिणाम खेळावर पहायला मिळाला. ज्यामुळे अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला. 
 
याआधी जेव्हा सुरुवातीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला होता, तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी करत 319 धावा केल्या होत्या. यानंतर मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला भारतीय संघाने 164 धावांवर ऑल आऊट केलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची ढिसाळ फलंदाजी पाहता अंतिम सामन्यात एक मोठी धावसंख्या उभारली असती, तर त्याचा पाठलाग करणं त्यांना कठिण गेलं असतं.
 
यामुळेच भारतीय संघ व्यवस्थापनाने अंतिम सामन्यात टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विराटने निर्णयाला बगल देत प्रथम गोलंदाजी करत असल्याचं जाहीर करुन टाकलं. उरली सुरली कसर विराट कोहलीने कुंबळेला उलट उत्तर देत भरुन टाकली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडलं, ज्याचा परिणाम खेळावर झाला. 
 
अंतिम सामन्यात फखर जमानने केलेल्या शतकाच्या आधारे पाकिस्तानने 338 धावांचा डोंगर उभा केला होता. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानने फक्त 158 धावांत गारद केलं, आणि 180 धावांनी दणदणीत पराभव केला.