शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्न पाहण्याचे धाडस केल्याने यशस्वी

By admin | Updated: September 14, 2016 05:11 IST

मी स्वप्न पाहिले आणि त्याहून महत्त्वाचे ते स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत दाखवली; म्हणून पदक मिळविण्यात यशस्वी ठरले, अशी प्रतिक्रिया पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी पहिला

नवी दिल्ली : मी स्वप्न पाहिले आणि त्याहून महत्त्वाचे ते स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत दाखवली; म्हणून पदक मिळविण्यात यशस्वी ठरले, अशी प्रतिक्रिया पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी पहिला भारतीय महिला खेळाडू दीपा मलिकने दिली. रिओ पॅरालिम्पिकमध्ये दीपाने एफ.५३ प्रकारात गोळाफेक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देऊन अभिमानास्पद कामगिरी केली. दीपाने सांगितले, ‘‘मी स्वप्न पाहण्याचे धाडस केले. त्याचप्रमाणे कठोर मेहनत घेण्याची माझी तयारी असल्याने त्या जोरावर मी माझे स्वप्न पूर्ण करू शकले. बहुतेक महिला ही संधी घालवतात; परंतु माझा निर्धार पक्का होता. मी माझ्या परिवाराकडेही कधी दुर्लक्ष केले नाही.’’ कमरेखालील भागामध्ये अर्धांगवायूचा झटका आलेल्या दीपावर पाठीच्या कण्यातील असलेल्या ट्युमरवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ती सुमारे १७ वर्षांपासून व्हीलचेअरवर आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, दीपावर तब्बल ३१ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.पदक जिंकल्यानंतर दीपा म्हणाली, ‘‘हे पदक जिंकून मी खूप आनंदी आहे आणि देशासाठी हे पदक जिंकल्याने त्याचा आनंद अधिक आहे. माझे प्रशिक्षक, भारतीय क्रीडा प्रधिकारण आणि क्रीडा मंत्रालयाची मी आभारी आहे. शिवाय, माझे टे्रनर असलेले माझे पती यांची मी खूप आभारी आहे. माझ्या मुली माझी ताकद आणि प्रेरणा आहेत. मायदेशी परतण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’’त्याचप्रमाणे, ‘‘मी आधी बाइकर, जलतरणपटू आणि रॅली ड्रायव्हर होते. आता देशाची पहिली महिला पॅरालिम्पिक पदकविजेती ठरले आहे. ही खूप मोठी बाब आहे. याचे श्रेय मी माझा परिवार आणि देशाला देईन.’’ (वृत्तसंस्था)४ कोटींचे रोख पारितोषिक...हरियाणा सरकारने आपल्या क्रीडा धोरणानुसार दीपा मलिकला ४ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक पटकावणारी भारतीय महिला मल्ल साक्षी मलिक हीदेखील हरियाणा राज्याचीच आहे. वरुणला एक कोटी मिळणार...रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी खेळामध्ये कांस्य पटकावलेला वरुण भाटी याला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. यूपी सरकारच्या अधिकृत पत्राद्वारे मुख्यमंत्री अखिलेश यांनी सांगितले, ‘‘वरुणने मेहनत आणि समर्पण या जोरावर देशाचे आणि राज्याचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशामुळे इतर दिव्यांग खेळाडूंना प्रेरणा मिळेल.’’राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा...दीपाने मिळविलेल्या यशाचे अभिनंदन करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले, ‘‘दीपाने मिळविलेले यश सर्व भारतीयांसाठी गौरवास्पद आहे. प्रत्येक खेळाडूसह देशातील शारीरिकरीत्या कमजोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठीदेखील दीपाचे यश प्रेरणादायी आहे. दीपाच्या यशाने सिद्ध होत आहे, की मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर ध्येय आणि यश मिळविता येते. भविष्यातील वाटचालीसाठी मी दीपाला शिभेच्छा देतो.’’