शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

दारुण पराभव... सावध होण्याची गरज

By admin | Updated: February 26, 2017 04:07 IST

खेळामध्ये शब्द आणि आकड्यांना विशेष महत्त्व असते, असे माझे मत आहे; पण पुण्यात भारतीय संघाचा पराभव बघितल्यानंतर शब्द दुय्यम ठरतात.

- हर्षा भोगले लिहितो़...खेळामध्ये शब्द आणि आकड्यांना विशेष महत्त्व असते, असे माझे मत आहे; पण पुण्यात भारतीय संघाचा पराभव बघितल्यानंतर शब्द दुय्यम ठरतात. यजमान संघाला सहायक ठरेल अशा खेळपट्टीवर भारतीय संघ ७४ षटकांमध्ये दोनदा बाद झाला. याचा अर्थ, एका दिवसात भारतीय संघ दोनदा बाद झाल्यानंतरही एक तासाचा वेळ वाचला असता. त्यामुळे हा दारुण पराभव आहे. याच खेळपट्टीवर आॅस्ट्रेलिया संघाने १८२ षटके फलंदाजी केली, तीही सर्वश्रेष्ठ गणल्या जाणाऱ्या माऱ्याविरुद्ध. आॅस्ट्रेलियाने परिस्थितीसोबत लवकर जुळवून घेतले, असे सहजपणे म्हणता येईल. पण, त्यांनी लढवय्या वृत्ती दाखविली, हे विसरता येणार नाही. आॅस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. एखाद्या बॉक्सरने आव्हान दिल्यानंतर त्याचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आल्याप्रमाणे हे आहे. विजयी घोडदौड सुरू असताना तुम्ही अनुकूल निकाल गृहीत धरता. खात्री आणि गृहीत धरणे यामध्ये फार थोडा फरक आहे. अभिमान आहे की घमेंड, हे ओळखणे आवश्यक आहे. प्रदीर्घ काळ जर तुमच्या मनाप्रमाणे घडत असेल, तर पुढे तुम्ही गृहीत धरण्यास सुरुवात करता; पण एखाद्या वेळेस पत्करावा लागलेला पराभव तुम्हाला पुन्हा हवेतून जमिनीवर आणण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आॅस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव कदाचित भारतीय संघाला जमिनीवर आणण्यासाठी पुरेसा ठरेल. त्यामुळे कधीकधी पत्करावा लागणारा हा पराभव काही वाईट बाब नाही. माझ्या अनुभवानुसार भारतीय संघाला जागे करणारा हा पराभव आहे. भारतीय संघ पलटवार करेल, याची आॅस्ट्रेलियालाही चांगली कल्पना आहे. गिलख्रिस्टने आॅस्ट्रेलिया संघाला ‘विजयाचा आनंद साजरा करा; पण दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा जोरादार सरावाला सुरुवात करा,’ असा सल्ला दिला आहे. ओकिफीच्या मनात काय घोळत असेल, याची कल्पना करा. वयाची तिशी गाठण्यापूर्वी विशेष संधी मिळाली नाही. श्रीलंका दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला आणि आता अचानक हे घवघवीत यश मिळविले. हे दोन दिवस पुन्हा त्याच्या कारकिर्दीत येणार नाहीत; पण त्या दोन दिवसांनी त्याला क्रीडा वर्तुळात मानाचे स्थान मिळवून दिले. क्रिकेट या खेळाची ही विशेषता आहे. स्टीव्ह स्मिथने कर्णधाराला साजेशी खेळी केली. आव्हान असले म्हणजे चॅम्पियनला आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी असते. भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल, असा मला विश्वास आहे आणि आॅस्ट्रेलियाला त्याची पूर्ण कल्पना आहे. (पीएमजी)