शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

दारुण पराभव... सावध होण्याची गरज

By admin | Updated: February 26, 2017 04:07 IST

खेळामध्ये शब्द आणि आकड्यांना विशेष महत्त्व असते, असे माझे मत आहे; पण पुण्यात भारतीय संघाचा पराभव बघितल्यानंतर शब्द दुय्यम ठरतात.

- हर्षा भोगले लिहितो़...खेळामध्ये शब्द आणि आकड्यांना विशेष महत्त्व असते, असे माझे मत आहे; पण पुण्यात भारतीय संघाचा पराभव बघितल्यानंतर शब्द दुय्यम ठरतात. यजमान संघाला सहायक ठरेल अशा खेळपट्टीवर भारतीय संघ ७४ षटकांमध्ये दोनदा बाद झाला. याचा अर्थ, एका दिवसात भारतीय संघ दोनदा बाद झाल्यानंतरही एक तासाचा वेळ वाचला असता. त्यामुळे हा दारुण पराभव आहे. याच खेळपट्टीवर आॅस्ट्रेलिया संघाने १८२ षटके फलंदाजी केली, तीही सर्वश्रेष्ठ गणल्या जाणाऱ्या माऱ्याविरुद्ध. आॅस्ट्रेलियाने परिस्थितीसोबत लवकर जुळवून घेतले, असे सहजपणे म्हणता येईल. पण, त्यांनी लढवय्या वृत्ती दाखविली, हे विसरता येणार नाही. आॅस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. एखाद्या बॉक्सरने आव्हान दिल्यानंतर त्याचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आल्याप्रमाणे हे आहे. विजयी घोडदौड सुरू असताना तुम्ही अनुकूल निकाल गृहीत धरता. खात्री आणि गृहीत धरणे यामध्ये फार थोडा फरक आहे. अभिमान आहे की घमेंड, हे ओळखणे आवश्यक आहे. प्रदीर्घ काळ जर तुमच्या मनाप्रमाणे घडत असेल, तर पुढे तुम्ही गृहीत धरण्यास सुरुवात करता; पण एखाद्या वेळेस पत्करावा लागलेला पराभव तुम्हाला पुन्हा हवेतून जमिनीवर आणण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आॅस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव कदाचित भारतीय संघाला जमिनीवर आणण्यासाठी पुरेसा ठरेल. त्यामुळे कधीकधी पत्करावा लागणारा हा पराभव काही वाईट बाब नाही. माझ्या अनुभवानुसार भारतीय संघाला जागे करणारा हा पराभव आहे. भारतीय संघ पलटवार करेल, याची आॅस्ट्रेलियालाही चांगली कल्पना आहे. गिलख्रिस्टने आॅस्ट्रेलिया संघाला ‘विजयाचा आनंद साजरा करा; पण दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा जोरादार सरावाला सुरुवात करा,’ असा सल्ला दिला आहे. ओकिफीच्या मनात काय घोळत असेल, याची कल्पना करा. वयाची तिशी गाठण्यापूर्वी विशेष संधी मिळाली नाही. श्रीलंका दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला आणि आता अचानक हे घवघवीत यश मिळविले. हे दोन दिवस पुन्हा त्याच्या कारकिर्दीत येणार नाहीत; पण त्या दोन दिवसांनी त्याला क्रीडा वर्तुळात मानाचे स्थान मिळवून दिले. क्रिकेट या खेळाची ही विशेषता आहे. स्टीव्ह स्मिथने कर्णधाराला साजेशी खेळी केली. आव्हान असले म्हणजे चॅम्पियनला आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी असते. भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल, असा मला विश्वास आहे आणि आॅस्ट्रेलियाला त्याची पूर्ण कल्पना आहे. (पीएमजी)