शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Dance With Me, I Am Single - विराट कोहली

By admin | Updated: February 9, 2016 13:19 IST

दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे हॉट कपल विभक्त झाल्याची अफवा, ही अफवा नसून वास्तव असल्याचे वृत्त आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे हॉट कपल विभक्त झाल्याची अफवा, ही अफवा नसून वास्तव असल्याचे वृत्त आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, विराटने अनुष्काला टि्वटरवरून व इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे, तसंच त्याने ह्रदयभंग असं शीर्षक असलेला स्वत:चा फोटो शेअर केला.
शनिवारच्या एका पार्टीमध्ये विराटने डान्स फ्लोअरवर मी सिंगल आहे, या माझ्याबरोबर डान्स करा असे मित्र मैत्रिणींना सांगत एकप्रकारे त्याचे व अनुष्काचे संबंध संपल्याचेच सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दोघांच्या जवळच्या मित्रमंडळीच्या सांगण्यानुसार अनुष्काने स्वत:ला कामामध्ये बुडवून घेतलं आहे. विशेष म्हणजे, जवळपास तीन महिने एकमेकांच्या संपर्कात नसणा-या विराटने श्रीलंका दौ-यातील टी-२० मालिकेत विश्रांती घेतली असून १४ फेब्रुवारीपर्यंत तो सुटीवर आहे. परंतु अनुष्काचे व्यस्त वेळापत्रक पाहुन त्याला धक्का बसला आणि त्यांचे संबंध तुटेपर्यंत ताणले गेले.
दोनच महिन्यांपूर्वी अनुष्काने एका मुलाखतीमध्ये विराटसाठी क्रिकेटच्या सामन्यांना जाण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मी स्टेडियममध्ये जाऊन त्याचा खेळ बघणं विराटला आवडतं असंही तिनं सांगितलं होतं. त्यामुळे केवळ दोनच महिन्यात असं काय घडलं असा धक्का या जोडीच्या चाहत्यांना बसला आहे. 
 
सूत्रांच्या सांगण्यानुसार विराटने लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु आत्ता करीअर महत्त्वाचं आहे, असं सांगत त्यावर जास्त लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला अनुष्कानं दिला होता. याच मुद्यावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असावा असं सांगण्यात येत आहे.