शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

टी-२० चे काउंटडाऊन...

By admin | Updated: January 28, 2017 00:39 IST

वारंवार सूचित करूनही विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिकाऱ्यांकडून सुरक्षेच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही.

नरेश डोंगरे / नागपूरवारंवार सूचित करूनही विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिकाऱ्यांकडून सुरक्षेच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही. क्रिकेट सामना काही तासांवर आला असूनदेखिल व्हीसीए पदाधिकाऱ्यांकडून सुरक्षेसंबंधाने चालढकल केली जात असल्याने पोलीस प्रशासनाचा रक्तदाब चांगलाच वाढला आहे.व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर २९ जानेवारीला भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यान टी-२० सामना होणार आहे. नागपूर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. येथे घातपात करण्यासाठी दहशतवादी संधीची वाट बघत आहेत. त्यामुळे ठोस नसला तरी गुप्तचर यंत्रणांकडून नागपूरला नेहमीच अलर्ट असतो. रविवारी होऊ पाहणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना त्याचमुळे संवेदनशील ठरला आहे. हा सामना चुरशीचा होईल, अशी अपेक्षा आहे. अवघ्या काही वेळात सामन्याची आॅनलाईन तिकीट विक्री बंद झाल्याने देश-विदेशातील क्रिकेट रसिकांची जामठ्यावर गर्दी उसळणार असल्याचा अंदाज आहे. ते लक्षात घेता पोलिसांनी खबरदारीच्या विविध उपाययोजना केल्या आहेत. मैदानात क्रिकेट सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीपासून तो सामना संपेपर्यंत आत-बाहेर कसलाही धोका होऊ नये, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षेची प्रत्येक बाब तावून सुलाखून बघितली जात आहे. याउलट व्हीसीएकडून सुरक्षेचा मुद्दा वाऱ्यावर सोडल्याचा समज झाल्याने पोलीस अधिकारी त्रागा व्यक्त करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सामन्याच्या वेळी व्हीसीएतर्फे स्टेडियमच्या आत-बाहेर कामगार आणि कर्मचारी ठेवले जाणार आहेत. ते किती आणि कोणकोण राहणार, त्याची यादी पोलिसांनी मागितली आहे. मात्र, अद्याप ती पोलिसांना मिळालेली नाही. कोणत्या कामासाठी कोणता कंत्राटदार आणि व्हेंडर आहे, त्याचीही माहिती, संपर्क क्रमांक पोलिसांना मिळालेले नाहीत. पोलिसांना ही यादी लवकर मिळाल्यास ‘त्या’ सर्व व्यक्तींची पोलीस चौकशी, शहानिशा करू शकतात. तसे अद्याप काहीही झालेले नाही. त्यामुळे व्हेंडर, कर्मचारी-कामगारांच्या नावावर कुणीही आत-बाहेर वावरण्याचा धोका आहे. दुर्दैवाने असे काही घडले अन् बनावट ओळखपत्राच्या आधारे भलताच कुणी आतमध्ये शिरल्यास काय करायचे, हा प्रश्न पोलिसांची झोपमोड करणारा ठरला आहे. सामन्याला अवघे काही तास उरले असताना अत्यावश्यक असे अग्निशमन यंत्रणेचे (फायर, मुंबई) प्रमाणपत्र पोलिसांना मिळालेले नाही. स्टेडियमची क्षमता अन् प्रेक्षक मर्यादेविषयक आलबेल असल्याचे प्रमाणपत्रही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पोलिसांना मिळाले नसल्याचे सांगितले जाते. याशिवायही सुरक्षेच्या अनेक बाबींची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनात अस्वस्थता आहे.---पोलिसांची मुस्कटदाबीसामन्याच्या वेळी, अगोदर अथवा नंतर सुरक्षेच्या संबंधाने कोणतीही चूक झाल्यास पोलिसांवरच खापर फुटणार आहे. तिकडे व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नाही. व्हीसीए सारख्या प्रभावी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस ‘आवाज‘ मोठा करून बोलू शकत नाही. त्यामुळे सामन्याच्या आणि खेळाडूंसोबतच हजारो प्रेक्षकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाची मुस्कटदाबी होत असल्याचा अनुभव आम्ही घेत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे मत आहे.