शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

पाकला परिस्थितीचे आकलन करता आले नाही

By admin | Updated: March 21, 2016 02:20 IST

भारताची गेल्या १५ वर्षांतील कामगिरी बघितल्यानंतर मला शारजामध्ये जुन्या स्पर्धांमध्ये पाकने केलेल्या कामगिरीची आठवण झाली.

भारताची गेल्या १५ वर्षांतील कामगिरी बघितल्यानंतर मला शारजामध्ये जुन्या स्पर्धांमध्ये पाकने केलेल्या कामगिरीची आठवण झाली. १९८०-९० च्या दशकांत विशेषत: शारजामध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवणारच असा आम्हाला विश्वास होता. गेल्या १५ वर्षांमध्ये भारतीय संघात तोच विश्वास झळकत आहे. पाकिस्तानने कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवण्याच्या घटनेला जवळजवळ अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. आशिया कप २०१४ मध्ये हे घडले होते. पण, त्यानंतर भारताने आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावला आहे. सर्वोत्तम कामगिरी करीत असल्यामुळे भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरत आहे. कोलकातामध्येही यापेक्षा वेगळे घडले नाही. युवी व कोहली यांच्यादरम्यान भागीदारी झाल्यानंतर भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. माझ्या मते १३०-१३५ धावांचे लक्ष्य असते तर भारतापुढे आव्हान निर्माण करता आले असते, पण ११८ धावांचे लक्ष्य फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर यजमान संघापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी पुरेसे नव्हते.सामन्याची सुरुवातच पाकसाठी अनुकूल नव्हती. त्यांना परिस्थितीचे आकलन करता आले नाही. फिरकीपटू इमाद वसीमला वगळून त्यांना खेळपट्टीचे आकलन करता आले नसल्याचे स्पष्ट झाले. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर चार वेगवान गोलंदाजांना खेळविण्याची रणनीती समजली नाही. भारतीय संघात युवी, शिखर व सुरेश रैना या तीन डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश असल्यामुळे डावखुऱ्या फिरकीपटूला न खेळविण्याची रणनीती समजू शकतो. विजय मिळवणाऱ्या संघात त्यांनी बदल करायला नको होता. महान खेळाडू इम्रानच्या बाजूला बसलो होतो. आफ्रिदीने आमिरचा स्पेल पूर्ण का केला नाही, असा प्रश्न इम्रानलाही पडला होता. आमिरला १३ व्या षटकांत पुन्हा गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. आफ्रिदीनेही चांगला मारा केला नाही. युवराजला कट शॉट खेळण्यास बाध्य करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याला बाद करण्याची संधी होती. धोनीने आश्विनपेक्षा बुमराहवर विश्वास दाखविला. विजय मिळवल्यानंतर सर्व प्रश्न गौण ठरतात. धोनीला हा प्रश्न कुणी विचारणार नाही.एकूण विचार करता पाकिस्तानसाठी हा मानसिक प्रश्न आहे. आयसीसीच्या स्पर्धेमध्ये त्यांना पुन्हा एकदा भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मी सुरुवातीलाच शारजाचा उल्लेख केला आहे. भारताची मानसिकता त्या वेळच्या पाक संघाप्रमाणे आहे, तर पाकची मानसिकता त्या वेळच्या भारतीय संघाप्रमाणे आहे. (टीसीएम)पाकिस्तानने स्थानिक क्रिकेटवर लक्ष पुरविणे आवश्यक आहे. पाकमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमधून दर्जेदार खेळाडू पुढे येतील, याबाबत विचार होणे आवश्यक आहे.