शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

पाकला परिस्थितीचे आकलन करता आले नाही

By admin | Updated: March 21, 2016 02:20 IST

भारताची गेल्या १५ वर्षांतील कामगिरी बघितल्यानंतर मला शारजामध्ये जुन्या स्पर्धांमध्ये पाकने केलेल्या कामगिरीची आठवण झाली.

भारताची गेल्या १५ वर्षांतील कामगिरी बघितल्यानंतर मला शारजामध्ये जुन्या स्पर्धांमध्ये पाकने केलेल्या कामगिरीची आठवण झाली. १९८०-९० च्या दशकांत विशेषत: शारजामध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवणारच असा आम्हाला विश्वास होता. गेल्या १५ वर्षांमध्ये भारतीय संघात तोच विश्वास झळकत आहे. पाकिस्तानने कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवण्याच्या घटनेला जवळजवळ अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. आशिया कप २०१४ मध्ये हे घडले होते. पण, त्यानंतर भारताने आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावला आहे. सर्वोत्तम कामगिरी करीत असल्यामुळे भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरत आहे. कोलकातामध्येही यापेक्षा वेगळे घडले नाही. युवी व कोहली यांच्यादरम्यान भागीदारी झाल्यानंतर भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. माझ्या मते १३०-१३५ धावांचे लक्ष्य असते तर भारतापुढे आव्हान निर्माण करता आले असते, पण ११८ धावांचे लक्ष्य फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर यजमान संघापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी पुरेसे नव्हते.सामन्याची सुरुवातच पाकसाठी अनुकूल नव्हती. त्यांना परिस्थितीचे आकलन करता आले नाही. फिरकीपटू इमाद वसीमला वगळून त्यांना खेळपट्टीचे आकलन करता आले नसल्याचे स्पष्ट झाले. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर चार वेगवान गोलंदाजांना खेळविण्याची रणनीती समजली नाही. भारतीय संघात युवी, शिखर व सुरेश रैना या तीन डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश असल्यामुळे डावखुऱ्या फिरकीपटूला न खेळविण्याची रणनीती समजू शकतो. विजय मिळवणाऱ्या संघात त्यांनी बदल करायला नको होता. महान खेळाडू इम्रानच्या बाजूला बसलो होतो. आफ्रिदीने आमिरचा स्पेल पूर्ण का केला नाही, असा प्रश्न इम्रानलाही पडला होता. आमिरला १३ व्या षटकांत पुन्हा गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. आफ्रिदीनेही चांगला मारा केला नाही. युवराजला कट शॉट खेळण्यास बाध्य करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याला बाद करण्याची संधी होती. धोनीने आश्विनपेक्षा बुमराहवर विश्वास दाखविला. विजय मिळवल्यानंतर सर्व प्रश्न गौण ठरतात. धोनीला हा प्रश्न कुणी विचारणार नाही.एकूण विचार करता पाकिस्तानसाठी हा मानसिक प्रश्न आहे. आयसीसीच्या स्पर्धेमध्ये त्यांना पुन्हा एकदा भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मी सुरुवातीलाच शारजाचा उल्लेख केला आहे. भारताची मानसिकता त्या वेळच्या पाक संघाप्रमाणे आहे, तर पाकची मानसिकता त्या वेळच्या भारतीय संघाप्रमाणे आहे. (टीसीएम)पाकिस्तानने स्थानिक क्रिकेटवर लक्ष पुरविणे आवश्यक आहे. पाकमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमधून दर्जेदार खेळाडू पुढे येतील, याबाबत विचार होणे आवश्यक आहे.