शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

पाकला परिस्थितीचे आकलन करता आले नाही

By admin | Updated: March 21, 2016 02:20 IST

भारताची गेल्या १५ वर्षांतील कामगिरी बघितल्यानंतर मला शारजामध्ये जुन्या स्पर्धांमध्ये पाकने केलेल्या कामगिरीची आठवण झाली.

भारताची गेल्या १५ वर्षांतील कामगिरी बघितल्यानंतर मला शारजामध्ये जुन्या स्पर्धांमध्ये पाकने केलेल्या कामगिरीची आठवण झाली. १९८०-९० च्या दशकांत विशेषत: शारजामध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवणारच असा आम्हाला विश्वास होता. गेल्या १५ वर्षांमध्ये भारतीय संघात तोच विश्वास झळकत आहे. पाकिस्तानने कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवण्याच्या घटनेला जवळजवळ अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. आशिया कप २०१४ मध्ये हे घडले होते. पण, त्यानंतर भारताने आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावला आहे. सर्वोत्तम कामगिरी करीत असल्यामुळे भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरत आहे. कोलकातामध्येही यापेक्षा वेगळे घडले नाही. युवी व कोहली यांच्यादरम्यान भागीदारी झाल्यानंतर भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. माझ्या मते १३०-१३५ धावांचे लक्ष्य असते तर भारतापुढे आव्हान निर्माण करता आले असते, पण ११८ धावांचे लक्ष्य फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर यजमान संघापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी पुरेसे नव्हते.सामन्याची सुरुवातच पाकसाठी अनुकूल नव्हती. त्यांना परिस्थितीचे आकलन करता आले नाही. फिरकीपटू इमाद वसीमला वगळून त्यांना खेळपट्टीचे आकलन करता आले नसल्याचे स्पष्ट झाले. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर चार वेगवान गोलंदाजांना खेळविण्याची रणनीती समजली नाही. भारतीय संघात युवी, शिखर व सुरेश रैना या तीन डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश असल्यामुळे डावखुऱ्या फिरकीपटूला न खेळविण्याची रणनीती समजू शकतो. विजय मिळवणाऱ्या संघात त्यांनी बदल करायला नको होता. महान खेळाडू इम्रानच्या बाजूला बसलो होतो. आफ्रिदीने आमिरचा स्पेल पूर्ण का केला नाही, असा प्रश्न इम्रानलाही पडला होता. आमिरला १३ व्या षटकांत पुन्हा गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. आफ्रिदीनेही चांगला मारा केला नाही. युवराजला कट शॉट खेळण्यास बाध्य करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याला बाद करण्याची संधी होती. धोनीने आश्विनपेक्षा बुमराहवर विश्वास दाखविला. विजय मिळवल्यानंतर सर्व प्रश्न गौण ठरतात. धोनीला हा प्रश्न कुणी विचारणार नाही.एकूण विचार करता पाकिस्तानसाठी हा मानसिक प्रश्न आहे. आयसीसीच्या स्पर्धेमध्ये त्यांना पुन्हा एकदा भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मी सुरुवातीलाच शारजाचा उल्लेख केला आहे. भारताची मानसिकता त्या वेळच्या पाक संघाप्रमाणे आहे, तर पाकची मानसिकता त्या वेळच्या भारतीय संघाप्रमाणे आहे. (टीसीएम)पाकिस्तानने स्थानिक क्रिकेटवर लक्ष पुरविणे आवश्यक आहे. पाकमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमधून दर्जेदार खेळाडू पुढे येतील, याबाबत विचार होणे आवश्यक आहे.