शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

Coronavirus : ऑलिम्पिकची नव्याने तयारी करू, डावपेचही आखू; आयओसीच्या निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 06:28 IST

coronavirus : आयओए महासचिव राजीव मेहता यांनी टोकियो आॅलिम्पिक आयोजन समितीला लिहिलेल्या पत्रात आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रकोपामुळे टोकियो आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्याच्या आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीच्या निर्णयाचे भारतीय आॅलिम्पिक संघटनेने स्वागत केले. दुसरीकडे स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे अनेक खेळाडूंच्या करिअरवर विपरीत परिणाम होईल, अशी कबुलीदेखील दिली. असे असले तरी आॅलिम्पिकची नव्याने तयारी करण्याचा तसेच डावपेच आखण्याचा निर्धार आयओए तसेच क्रीडा मंत्रालयाने व्यक्त केला आहे.आयओए महासचिव राजीव मेहता यांनी टोकियो आॅलिम्पिक आयोजन समितीला लिहिलेल्या पत्रात आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे. आम्ही सर्वजण त्यांची आवश्यक मदत करणार असून भारतातील लॉक डाऊन संपल्यानंतर सर्वच महासंघांसोबत चर्चा करण्यात येईल, असे सांगून खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरी असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.दरम्यान, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानेदेखील आॅलिम्पिकसाठी नव्याने तयारी करण्याचे आणि संशोधित योजना आखण्याचे संकेत दिले आहेत. (वृत्तसंस्था)पॅरालिम्पिक समितीनेही केले स्वागतनवी दिल्ली : भारतीय पॅरालिम्पिक समितीने टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे तयारीबाबत द्धिधा मन:स्थितीत असलेल्या खेळाडूंना दिलासा लाभेल, असे म्हटले आहे. पीसीआय महासचिव गुरुशरणसिंग यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर पीसीआय पुढील डावपेच आखेल, असे म्हटले आहे. अध्यक्ष दीपा मलिक यांनी याआधी खेळाडूंच्या आरोग्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे म्हटले होते.‘कोरोनाच्या जागतिक संकटामुळे टोकियो २०२० आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभर पुढे ढकलण्याच्या आयओसीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. जगभरातील खेळाडूंच्या हितासाठी हा निर्णय आवश्यक होता. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सर्वच भारतीय खेळाडूंना यथायोग्य मदत करण्याचे मी आश्वासन देत आहे. सद्यस्थितीचा त्यांच्या तयारीवर परिणाम होणार नाही, याची ग्वाही देतो. खेळाडूंनी निराश होऊ नये. आम्ही याहून सर्वोत्कृष्ट तयारी करू आणि योजना आखू. भारत २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल.’-किरेन रिजिजू, क्रीडामंत्री

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020corona virusकोरोना वायरस बातम्या