शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

सातत्य, सरावाशिवाय यश मुश्किल: अभिजित कुंटे

By admin | Updated: May 5, 2014 14:36 IST

येत्या काळात महाराष्ट्रातील बुद्धिबळपटूंना यश संपादन करण्यासाठी कामगिरीमध्ये सातत्य आणि सराव अत्यंत आवश्यक आहे

नाशिक : येत्या काळात महाराष्ट्रातील बुद्धिबळपटूंना यश संपादन करण्यासाठी कामगिरीमध्ये सातत्य आणि सराव अत्यंत आवश्यक आहे. तामिळनाडू, केरळच्या बुद्धिबळपटूंकडून अत्यंत कडवे आव्हान महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी असणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी आपल्या खेळावरच लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी शारीरिक क्षमता आणि नियमित सराव गरजेचे असल्याचे पुण्याचा ग्रॅँडमास्टर अभिजित कुंटे याने केले. सिटी सेंटर मॉल येथे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी अभिजित कुंटे बोलत होते. सदर स्पर्धेच्या मुलांच्या गटातून नगरचा संकर्ष शेळके व ठाण्याचा शार्दूल वाकाडे तर मुलींच्या गटातून नागपूरची दिव्या देशमुख व श्रीया ठाकरे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याशिवाय मुलींच्या अंडर ११ गटात मंुबईची पिया सक्सेना, नागपूरची इशा सारडा, मंुबईची अवरिल डेव्हीड, नागपूरची नारायणी आज्ञे, मंुबईची आरोही दाभोळकर, आदिती कृष्णन्, इशा शाह, अनन्य गुप्ता यांनी यश नोंदविले. मुलांच्या गटात नागपूरचा संकल्प गुप्ता, सारांश जेसवाणी, पुण्याचा ओजस कर्नावट, नागपूरची रौनक सादवाणी, मुंबईचा वेदांत पानेसर, आदित गुवाघरकर, शौर्य जैन, रिसब शाह यांनी यश नोंदविले. नाशिक बेस्टच्या किताबात मुलींमध्ये जान्हवी कौशिक, श्रीया कुलकर्णी, श्रृती राका, वृंदा राठी, कंुचिता कुंटे तर मुलांमध्ये जयंत शिरोरे, सिद्धांत देवरे, आविष्कार वानखडे, वरुण वाघ, सोहम दुसाने यांनी यश नोंदविले. पारितोषिक प्रदान सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष धनंजय बेळे, सुमित नहार, सिटी सेंटर मॉलचे राजपूत उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून राजेंद्र शिरोदे यांनी काम पाहिले तर प्रवीण ठाकरे, मंगेश गंभीरे, मिलिंद नाईक यांनी पंच म्हणून काम पाहिले.