शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सांघिक कामगिरीचा विजय

By admin | Updated: March 8, 2017 01:35 IST

भारतीय संघाने काय जबरदस्त विजय मिळवला. कमी धावसंख्येच्या सामन्यात ७५ धावांनी विजय हा मोठा विजय समजला जावा, कारण भारताला फक्त १८७ धावांचा बचाव करायचा होता.

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)भारतीय संघाने काय जबरदस्त विजय मिळवला. कमी धावसंख्येच्या सामन्यात ७५ धावांनी विजय हा मोठा विजय समजला जावा, कारण भारताला फक्त १८७ धावांचा बचाव करायचा होता. त्यामध्ये हे विजयाचे मार्जिन खूप मोठे मानले गेले पाहिजे. खेळपट्टी गोलंदाजीला पोषक होती. परंतु, पहिला सामना हरल्यानंतर टीम इंडियाने ज्याप्रमाणे पुनरागमन केले, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. मी सर्वच खेळाडूंच्या कामगिरीची प्रशंसा करीन. कारण, दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी जी मालिकेतील एकमेव शतकी भागीदारी केली, ती अद्वितीय होती. सामनावीरचा पुरस्कार मिळवलेल्या के. एल. राहुलने अशा खेळपट्टीवर दोन्ही डावांत अर्धशतके झळकाने कठीण असते, परंतु त्याने दाखवून दिले की, तो कशा पद्धतीने आपल्या खेळाला प्राप्त परिस्थितीनुसार बदलू शकतो. गोलंदाजांनी तर कमालच केली. पहिल्या डावात रवींद्र जडेजा आणि दुसऱ्या डावात रविचंद्रन आश्विनने अतुलनीय कामगिरी केली. इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात केलेला मारा महत्त्वपूर्ण होता. कारण, यावेळी आॅस्ट्रेलिया संघ चांगल्या परिस्थितीत होता. या जोडगोळीने टिच्चून मारा करून पाहुण्या संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यापासून परावृत्त केले. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विराट कोहलीचे आक्रमक नेतृत्व. संघाचे मनोधैर्य वाढावे, म्हणून तो प्रेक्षकांनाही टाळ्या वाजवण्यास उत्तेजित करीत होता. एकूणच हा एक सांघिक कामगिरीचा विजय होता. या विजयाने भारताने चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असली तरी मालिकेत भारताचे पारडे आता जड झाले आहे; कारण आता मानसिक दबाव आॅस्ट्रेलियन संघावर असेल. त्यातून त्यांना मालिकेत पुनरागमन करणे कठीण बनणार आहे. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर आॅस्ट्रेलियाचे वर्चस्व होते. कालची नाबाद जोडी पुजारा आणि रहाणे हे दोघे पुढे मोठी खेळी करतील असे वाटत असताना आॅस्ट्रेलियन जलदगती जोडी हेजलवूड आणि स्टार्क यांनी सामन्यावर वर्चस्व गाजवून भारताचे सहा फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत पाठवले. या दोघांच्या कामगिरीमुळे आॅॅस्ट्रेलियाला टार्गेट मिळाले ते केवळ १८८ धावा करण्याचे. यावेळी भारत सामना हरतो की काय, अशी शंका वाटू लागली होती. भारताने सव्वादोनशे ते अडीचशे धावांची आघाडी घेतली असती तर बरे झाले असते, असे वाटत होते. आस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला आश्विनने पुन्हा एकदा बकरा बनविले. खेळपट्टीवरील भेगांमुळे चेंडू कसाही वळण घेत असला तरी आपल्या अपारंपरिक फूटवर्कमुळे स्टिव्ह स्मिथला त्याचा फारसा त्रास होत नव्हता. तो खेळपट्टीवर जोपर्यंत होता, तोपर्यंत आॅस्ट्रेलियाला विजयाची आशा होती; परंतु उमेश यादवने स्मिथचा बळी घेतला आणि सामना भारताच्या बाजूने झुकविला. त्याचवेळी सामन्याचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले होते. सांघिक कामगिरीने शेवटी एक शानदार विजय साकारला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय खेळाडूंच्या देहबोलीवरून कधीही असे वाटत नव्हते की, ते हा सामना हरणार आहेत. ही सर्वांत मोठी गोष्ट होती.