शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

आत्मविश्वास हा अधिक महत्त्वाचा भाग

By admin | Updated: February 26, 2017 23:55 IST

खेजीवनात चांगले-वाईट अनुभव येत असतात. पराभवापेक्षा त्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.

-हर्षा भोगले खेजीवनात चांगले-वाईट अनुभव येत असतात. पराभवापेक्षा त्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात. अंतर्मुख होत पराभव झटकून आगेकूच करणे महत्त्वाचे ठरते. भारतीय संघ आता बंगळुरूकडे प्रयाण करणार आहे. भारतीय संघाच्या क्षमतेवर शंका घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यजमान संघाची पुनरागमन करण्याच्या क्षमतेबाबत उत्सुकता आहे. खेळाडूंच्या जीवनात आत्मविश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. ‘हे मी करू शकतो’ किंवा ‘हे मला करता येईल का?’ या दोन्ही विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. यात कर्णधार आणि प्रशिक्षक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याचे एक कारण आहे. या मालिकेत विजयासाठी भारतीय संघाला पसंती देण्यात आली होती. पण पहिल्या कसोटी सामन्यात संघातील उणिवा चव्हाट्यावर आल्या. त्यामुळे खेळाडूंच्या आत्मविश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. चांगले खेळाडू वाईट अनुभव विसरून भविष्यात चमकदार कामगिरी कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रित करतात. पहिला सेट गमावला असला तरी अद्याप सामना जिंकण्याची संधी आहे, हे विसरता येणार नाही. प्रतिस्पर्धी तंबूतील खेळाडू मोहीम फत्ते केल्यानंतर एकमेकांकडे बघत होते आणि आपण खरंच हे साध्य करू शकतो? असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. स्टार्क, ओकिफी आणि स्मिथ हे आॅस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. त्यांना फलंदाजीमध्ये रेनशॉ, क्षेत्ररक्षणात हँड््सकोंब आणि गोलंदाजीमध्ये लियोनची साथ लाभली. वॉर्नर व हेजलवूड चांगले खेळाडू असून, त्यांना या मालिकेत मोठी भूमिका बजवायची आहे. मार्श बंधूही छाप सोडतील अशी आशा आहे. भारतीय संघासाठी सकारात्मक बाब म्हणजे उमेश यादवची गोलंदाजी ठरली. भारतीय वातावरणामध्ये रिव्हर्स स्विंग गोलंदाजीच्या बळावर त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. तो चांगला खेळाडू असून फॉर्मात आहे. तो कोहलीकडे अधिक गोलंदाजी करण्याची मागणी करू शकतो. शमी लवकर फिट व्हावा, हे भारतीय संघासाठी आवश्यक आहे. बंगळुरूमध्ये चार गोलंदाज खेळवायचे की पाच हा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो. भारतीय संघाला पराभवावर मंथन करायला पुरेसा वेळ असून बंगळुरूमध्ये चुरशीची लढत अनुभवायला मिळेल, अशी आशा आहे. (पीएमजी)