शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

आत्मविश्वास हा अधिक महत्त्वाचा भाग

By admin | Updated: February 26, 2017 23:55 IST

खेजीवनात चांगले-वाईट अनुभव येत असतात. पराभवापेक्षा त्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.

-हर्षा भोगले खेजीवनात चांगले-वाईट अनुभव येत असतात. पराभवापेक्षा त्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात. अंतर्मुख होत पराभव झटकून आगेकूच करणे महत्त्वाचे ठरते. भारतीय संघ आता बंगळुरूकडे प्रयाण करणार आहे. भारतीय संघाच्या क्षमतेवर शंका घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यजमान संघाची पुनरागमन करण्याच्या क्षमतेबाबत उत्सुकता आहे. खेळाडूंच्या जीवनात आत्मविश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. ‘हे मी करू शकतो’ किंवा ‘हे मला करता येईल का?’ या दोन्ही विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. यात कर्णधार आणि प्रशिक्षक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याचे एक कारण आहे. या मालिकेत विजयासाठी भारतीय संघाला पसंती देण्यात आली होती. पण पहिल्या कसोटी सामन्यात संघातील उणिवा चव्हाट्यावर आल्या. त्यामुळे खेळाडूंच्या आत्मविश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. चांगले खेळाडू वाईट अनुभव विसरून भविष्यात चमकदार कामगिरी कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रित करतात. पहिला सेट गमावला असला तरी अद्याप सामना जिंकण्याची संधी आहे, हे विसरता येणार नाही. प्रतिस्पर्धी तंबूतील खेळाडू मोहीम फत्ते केल्यानंतर एकमेकांकडे बघत होते आणि आपण खरंच हे साध्य करू शकतो? असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. स्टार्क, ओकिफी आणि स्मिथ हे आॅस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. त्यांना फलंदाजीमध्ये रेनशॉ, क्षेत्ररक्षणात हँड््सकोंब आणि गोलंदाजीमध्ये लियोनची साथ लाभली. वॉर्नर व हेजलवूड चांगले खेळाडू असून, त्यांना या मालिकेत मोठी भूमिका बजवायची आहे. मार्श बंधूही छाप सोडतील अशी आशा आहे. भारतीय संघासाठी सकारात्मक बाब म्हणजे उमेश यादवची गोलंदाजी ठरली. भारतीय वातावरणामध्ये रिव्हर्स स्विंग गोलंदाजीच्या बळावर त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. तो चांगला खेळाडू असून फॉर्मात आहे. तो कोहलीकडे अधिक गोलंदाजी करण्याची मागणी करू शकतो. शमी लवकर फिट व्हावा, हे भारतीय संघासाठी आवश्यक आहे. बंगळुरूमध्ये चार गोलंदाज खेळवायचे की पाच हा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो. भारतीय संघाला पराभवावर मंथन करायला पुरेसा वेळ असून बंगळुरूमध्ये चुरशीची लढत अनुभवायला मिळेल, अशी आशा आहे. (पीएमजी)