शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टीकाकारांना लाज वाटली पाहिजे - दुखावलेल्या विराटने सोडले मौन

By admin | Updated: April 10, 2015 15:28 IST

वर्ल्डकप सेमीफायनलमधील निराशाजनक खेळीमुळे चाहत्यांच्या टीकेचा धनी व्हावा लागलेल्या विराट कोहलीने आपले मौन सोडले असून चाहत्यांना लाज वाटली पाहिजे, असे म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात अवघी १ धाव काढून तंबूत परतलेला विराट कोहली व त्याची प्रेयसी अनुष्का शर्मावर चाहत्यांनी टीकास्त्र सोडले. सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले होते. इतके दिवस या विषयावर काहीही न बोलणा-या विराटने अखेर आपले मौन सोडले आहे. ' चाहत्यांच्या या वागण्यामुळे मी अतिशय दुखावलो गेलो आहे. त्यांना त्यांच्या वागण्याबद्दल लाज वाटली पाहिजे' अशी उद्विग्न प्रतिक्रिया विराटने दिली आहे. 
'या घटनेमुळे मी खूप निराश झालो आहे. त्या सामन्यापूर्वी मी सातत्याने चांगली कामगिरी केली होती, मात्र फक्त एका सामन्यातील अपयशामुळे मला टीकेचे धनी व्हावे लागले. अशा घटनांमुळे तुम्ही लोकांवरील विश्वास गमावता. त्या सामन्यानंतर चाहत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अतिशय निराशजनक होत्या', असे सांगत कोहलीन त्याचे दु:ख व्यक्त केले आहे.  
सेमीफायनलमध्ये कोहलीच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तो सामना ९५ धावांनी गमावल्याने भारताचे अंतिम फेरीत पोचण्याचे स्वप्न भंगले होते. 
क्रिकेट चाहत्यांनी जरी विराटवर टीकास्त्र सोडले असले तरी अनेक दिग्गज क्रिकेटपटू व बॉलिवूड सेलिब्रिटी विराट व अनुष्काच्या समर्थनार्थ पुढे आले. विराट-अनुष्काच्या नात्याचा आदर राखायला सांगत शांत रहा असे आवाहन सेलिब्रिटींनी केले होते.