शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

टीकाकारांना लाज वाटली पाहिजे - दुखावलेल्या विराटने सोडले मौन

By admin | Updated: April 10, 2015 15:28 IST

वर्ल्डकप सेमीफायनलमधील निराशाजनक खेळीमुळे चाहत्यांच्या टीकेचा धनी व्हावा लागलेल्या विराट कोहलीने आपले मौन सोडले असून चाहत्यांना लाज वाटली पाहिजे, असे म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात अवघी १ धाव काढून तंबूत परतलेला विराट कोहली व त्याची प्रेयसी अनुष्का शर्मावर चाहत्यांनी टीकास्त्र सोडले. सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले होते. इतके दिवस या विषयावर काहीही न बोलणा-या विराटने अखेर आपले मौन सोडले आहे. ' चाहत्यांच्या या वागण्यामुळे मी अतिशय दुखावलो गेलो आहे. त्यांना त्यांच्या वागण्याबद्दल लाज वाटली पाहिजे' अशी उद्विग्न प्रतिक्रिया विराटने दिली आहे. 
'या घटनेमुळे मी खूप निराश झालो आहे. त्या सामन्यापूर्वी मी सातत्याने चांगली कामगिरी केली होती, मात्र फक्त एका सामन्यातील अपयशामुळे मला टीकेचे धनी व्हावे लागले. अशा घटनांमुळे तुम्ही लोकांवरील विश्वास गमावता. त्या सामन्यानंतर चाहत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अतिशय निराशजनक होत्या', असे सांगत कोहलीन त्याचे दु:ख व्यक्त केले आहे.  
सेमीफायनलमध्ये कोहलीच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तो सामना ९५ धावांनी गमावल्याने भारताचे अंतिम फेरीत पोचण्याचे स्वप्न भंगले होते. 
क्रिकेट चाहत्यांनी जरी विराटवर टीकास्त्र सोडले असले तरी अनेक दिग्गज क्रिकेटपटू व बॉलिवूड सेलिब्रिटी विराट व अनुष्काच्या समर्थनार्थ पुढे आले. विराट-अनुष्काच्या नात्याचा आदर राखायला सांगत शांत रहा असे आवाहन सेलिब्रिटींनी केले होते.