शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार : क्लार्क

By admin | Updated: March 22, 2015 01:14 IST

२६ मार्च रोजी सिडनीत होणाऱ्या स्पर्धेतील उपांत्य फेरीत आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले आहे.

अ‍ॅडिलेड : भारताला आॅस्ट्रेलियातील परिस्थितीची चांगली माहिती आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत सहयजमान संघाला २६ मार्च रोजी सिडनीत होणाऱ्या स्पर्धेतील उपांत्य फेरीत आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले आहे.आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी येथे उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये भारताविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल, असे क्लार्कने मान्य केले. क्लार्क म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियातील दौऱ्याच्या सुरुवातीच्या तुलनेत आता भारतीय संघ चांगला खेळत आहे. विश्वचषकाआधीही आपण भारताला पराभूत करणे कठीण असेल, असे म्हटले होते. त्यांचा संघ खूप चांगला आहे आणि त्यांनी आॅस्ट्रेलियात अधिक वेळ व्यतीत केला आहे. त्यामुळे त्यांना येथील परिस्थिती चांगली माहीत आहे. निश्चितच गुरुवारची लढत आव्हानात्मक असेल. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.विशेष म्हणजे, पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल् हकने पारंपरिक रूपाने फिरकी गोलंदाजीला अनुकूल असलेल्या सिडनीवर भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)तसेच, आॅस्ट्रेलियाकडे फिरकी गोलंदाजीच्या पर्यायाची उणीव आहे, असेही त्याने म्हटले होते; परंतु क्लार्क तसा विचार करीत नाही.क्लार्क म्हणाला, ‘‘मला वाटत नाही, की श्रीलंकेविरुद्ध आमच्या गत सामन्यात चेंडू जास्त स्पिन झाला. हे सर्व काही खेळपट्टी कशी तयार केली आहे, यावर अवलंबून आहे. खेळपट्टीवर गवत असल्यास निश्चितच आमच्या गोलंदाजांना साह्यकारक ठरेल. जर चेंडू स्पिन झाला तर आमच्या संघातही स्पिनसाठी पर्याय उपलब्ध आहेत. निवड समिती एससीजीवर पोहोचल्यानंतर त्याचे आकलन करून सर्वोत्तम संघ निवडतील, अशी आपल्याला आशा आहे.’’ (वृत्तसंस्था)