शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार : क्लार्क

By admin | Updated: March 22, 2015 01:14 IST

२६ मार्च रोजी सिडनीत होणाऱ्या स्पर्धेतील उपांत्य फेरीत आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले आहे.

अ‍ॅडिलेड : भारताला आॅस्ट्रेलियातील परिस्थितीची चांगली माहिती आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत सहयजमान संघाला २६ मार्च रोजी सिडनीत होणाऱ्या स्पर्धेतील उपांत्य फेरीत आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले आहे.आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी येथे उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये भारताविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल, असे क्लार्कने मान्य केले. क्लार्क म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियातील दौऱ्याच्या सुरुवातीच्या तुलनेत आता भारतीय संघ चांगला खेळत आहे. विश्वचषकाआधीही आपण भारताला पराभूत करणे कठीण असेल, असे म्हटले होते. त्यांचा संघ खूप चांगला आहे आणि त्यांनी आॅस्ट्रेलियात अधिक वेळ व्यतीत केला आहे. त्यामुळे त्यांना येथील परिस्थिती चांगली माहीत आहे. निश्चितच गुरुवारची लढत आव्हानात्मक असेल. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.विशेष म्हणजे, पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल् हकने पारंपरिक रूपाने फिरकी गोलंदाजीला अनुकूल असलेल्या सिडनीवर भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)तसेच, आॅस्ट्रेलियाकडे फिरकी गोलंदाजीच्या पर्यायाची उणीव आहे, असेही त्याने म्हटले होते; परंतु क्लार्क तसा विचार करीत नाही.क्लार्क म्हणाला, ‘‘मला वाटत नाही, की श्रीलंकेविरुद्ध आमच्या गत सामन्यात चेंडू जास्त स्पिन झाला. हे सर्व काही खेळपट्टी कशी तयार केली आहे, यावर अवलंबून आहे. खेळपट्टीवर गवत असल्यास निश्चितच आमच्या गोलंदाजांना साह्यकारक ठरेल. जर चेंडू स्पिन झाला तर आमच्या संघातही स्पिनसाठी पर्याय उपलब्ध आहेत. निवड समिती एससीजीवर पोहोचल्यानंतर त्याचे आकलन करून सर्वोत्तम संघ निवडतील, अशी आपल्याला आशा आहे.’’ (वृत्तसंस्था)