शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

आघाडीच्या संघांमुळे वाढली चॅम्पियन्स ट्रॉफीमधील चुरस - कोहली

By admin | Updated: May 24, 2017 19:18 IST

इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्पर्धेत आघाडीच्या निवडक संघांनाच प्रवेश देण्यात आल्याने या स्पर्धेतील

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - सुमारे दीड महिने चाललेला आयपीएलचा हंगाम आटोपल्यानंतर आता भारतीय संघ पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज झाला आहे. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत आघाडीच्या निवडक संघांनाच प्रवेश देण्यात आल्याने या स्पर्धेतील चुरस वाढल्याचे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे. 

या स्पर्धेतील गतविजेता असलेल्या भारतीय संघासमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान आहे. तर महेंद्रसिंह धोनीकडून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाचा प्रथमच आयसीसीच्या जागतिक स्पर्धेत कस लागणार आहे. दरम्यान, 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी आज विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विराट म्हणाला, "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी क्रिकेटमधील आघाडीच्या मोजक्याच संघांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे या संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील स्पर्धात्मकता वाढली आहे."

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गतविजेत्या भारताची सलामीची लढत पाकिस्ताविरुद्ध होणार आहे. 4 जून रोजी होणाऱ्या लढतीमुळे सध्या क्रिकेटप्रेमींमधील उत्सुकता वाढली आहे. या लढतीबाबत विराट म्हणाला, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये रोमांचपूर्ण वातावरण असते. पण आमच्यासाठी फार काही बदलत नाही. आमच्यासाठी तो फक्त एक क्रिकेटचा सामना असतो."