शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

चोकर्स पुन्हा बनले जोकर!!!

By admin | Updated: June 12, 2017 04:14 IST

महत्त्वाच्या लढतीत ढेपाळण्याच्या वृत्तीमुळे चोकर्सचा शिक्का बसलेला हा संघ आज पुन्हा आपल्या नावाला जागला.

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमतचांगली सवय लागायला वेळ लागतो, पण वाईट खोडी मात्र सुटता सुटत नाहीत. काहीशी अशीच अवस्था झाली आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाची. महत्त्वाच्या लढतीत ढेपाळण्याच्या वृत्तीमुळे चोकर्सचा शिक्का बसलेला हा संघ आज पुन्हा आपल्या नावाला जागला. त्याचाच फायदा उठवत विराट कोहलीच्या भारतीय संघाने अगदी करो वा मरो अशी स्थिती असलेल्या लढतीत या चोकर्सना पुन्हा एकदा जोकर बनवले.श्रीलंकेकडून मार खाल्ल्यानंतर भारतासाठी ही लढत काहीशी कठीण मानली जात होती. त्याला कारणही तसेच होते म्हणा, एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला दक्षिण आफ्रिकचा संघ भारतीय संघापेक्षा कांकणभर सरस भासत होता. त्यामुळे ते भारतीय संघाची विकेट तर काढणार नाहीत ना? अशी भीती भारतीय क्रिकेटप्रेमींना राहून राहून वाटत होती. पण प्रत्यक्षात शत्रूला बलाढ्य समजून मोठ्या तयारीनिशी मोहिमेवर जावे आणि शत्रूने पहिल्या प्रहराच हार मानून पांढरे निशाण फडकवावे, तसे पांढरे निशाण दक्षिण आफ्रिकेने विराटसेनेसमोर फडकवले.

आणखी वाचा : एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!

तसे ते महत्त्वाच्या लढतीत कोलमडण्यासाठी कुप्रसिद्ध आहेतच. त्यांच्या या दुर्गुणाचा आपणही अनेकदा फायदा उचललाय. आजही तेच केले. नाणेफेकीचा कौल आपल्यासाठी शुभशकून ठरला. मग आपली गोलंदाजी पुन्हा बहरली. सलामीलाच पाकिस्तानचे शिरकाण केल्यानंतर लंकेविरुद्ध मात्र गोलंदाज मंडळी थंडावल्यासारखी वाटली. पण आफ्रिकेविरुद्ध मात्र गोलंदाजीत पुन्हा आग दिसली. कमाल म्हणजे आज आपले क्षेत्ररक्षण जबरदस्त झाले. एवढे जबरदस्त की समोरचे आफ्रिकन फलंदाज गोंधळले. अगदी अमला, डीकॉक, डीव्हिलियर्स, मिलर, दुमिनी, मॉरिस असे फर्डे फटकेबाज दिमतीला असतानाही. आपल्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी कामगिरी चोख बजावली. त्यांच्या चक्रव्यूहात आफ्रिकी फलंदाज अलगद अडकले, अडखळले आणि भांबावलेल्या अवस्थेत बाद झाले.

आणखी वाचा - "धवन"ने गाठले नवे "शिखर", सचिनचा तोडला रेकॉर्ड

बाकी 192 ही काय आपल्यासाठी अवघड बाब नव्हती. गोलंदाजांनी आधीच बुरुजांना सुरुंग लावल्याने फार हानी न होता आफ्रिकन किल्यावर निशाण फडकवण्याचे काम फलंदाजांवर होते. धवन आणि कोहलीने ते अगदी आरामात पार पाडले. आता उपांत्य फेरीत आपली गाठ बांगलादेशशी पडण्याची शक्यता आहे. स्पर्धेत काहीशा नशिबवान ठरलेल्या बांगलादेशपेक्षा विराटसेना नक्कीच उजवी आहे. पण आपल्याला गाफील राहणे परवडणार नाही.