शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

बांगलादेशसमोर 459 धावांचे आव्हान

By admin | Updated: February 12, 2017 14:23 IST

ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 12 - एकमेव कसोटीत भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 459 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्या डावात 299 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 159 धावा कुटत आपली आघाडी 458 धावांवर पोहोचवली आणि दुसरा डाव घोषित केला.दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताचे दोन्ही सलामीवीर मुरली विजय (7), लोकेश राहुल ...

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 12 - एकमेव कसोटीत भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 459 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्या डावात 299 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 159 धावा कुटत आपली आघाडी 458 धावांवर पोहोचवली आणि दुसरा डाव घोषित केला.
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताचे दोन्ही सलामीवीर मुरली विजय (7), लोकेश राहुल (10) झटपट बाद झाले. मात्र चेतेश्वर पुजारा (नाबाद 54), विराट कोहली (38), अजिंक्य रहाणे (28) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 16) यांनी झटपट फलंदाजी करत भारताची आघाडी साडेचारशेच्या पलिकडे पोहोचवली. 
भारताच्या  687 धावांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशने मुशफिकूर रहिमच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात चिवट फलंदाजी करत 388 धावांपर्यंत मजल मारली. मात्र बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 299 धावांनी मागे राहिल्यानंतरही कर्णधार विराट कोहलीने पाहुण्यांना फॉलो ऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात बिनबाद एक धाव केली होती. 
तत्पूर्वी कालच्या 6 बाद 322 धावांवरून पुढे खेळणाऱ्या बांगलादेशच्या फलंदाजांनी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात चिवट फलंदाजी केली. शानदार शतकी खेळी करणाऱ्या कर्णधार मुशफिकूर रहिमने तळाच्या फलंदाजांच्या साथीने बांगलादेशच्या धावसंख्येत अजून 66 धावांची भर घातली. त्याबरोबरच भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक फटकावणारा मुशफिकूर बांगलादेशचा पहिला फलंदाज ठरला. एक बाजू लावून धरणारा मुशफिकूर 127 धावांवर बाद झाल्यावर बांगलादेशचा डाव 388 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून उमेश यादवने तीन, तर अश्विन आणि जडेजाने दोन गडी बाद केले.