शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

'कॅप्टन' कूकने दिला राजीनामा

By admin | Updated: February 6, 2017 19:26 IST

. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य होत असलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूकने आपल्या पदाचा

ऑनलाइन लोकमत
 लंडन, दि. 6 - कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 अशा तिन्ही प्रकारात झालेल्या दारुण पराभवामुळे पूर्णपणे निराशाजनक ठरलेल्या भारत दौऱ्यानंतर इंग्लंड क्रिकेटला अजून एक मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य होत असलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 
"गेली 5 वर्षे इंग्लंडचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्माननीय होते. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी कठीण होता, पण हा निर्णय माझ्यासाठी आणि इंग्लिश संघासाठी योग्य आहे असे मला वाटते," असे कूकने कप्तानी सोडल्यानंतर सांगितले.  
कूकने 59 कसोटी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले होते. डावखुरा फलंदाज म्हणून  संघासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या कूकची कप्तानी कारकीर्द चढ-उतारपूर्ण राहिली. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2013 आणि 2015 साली झालेल्या अॅशेस मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. तसेच दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका आदी संघांनाही कूकच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने पराभूत केले होते. पण 2013मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅसेस मालिका, तसेच गतवर्षी पाकिस्तान आणि भारताविरुद्घच्या मालिकांमध्ये  इंग्लंडला दारुण पराभव पत्करावा लागला होता.