शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडून कॅनडा पुन्हा पराभूत

By admin | Updated: July 25, 2016 01:45 IST

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या महिला भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या सामन्यात कॅनडाला पराभूत केले. भारतीय संघाने कॅनडावर ३-१ अशा गोलफरकाने विजय संपादन केला

मॅनहॅम : अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या महिला भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या सामन्यात कॅनडाला पराभूत केले. भारतीय संघाने कॅनडावर ३-१ अशा गोलफरकाने विजय संपादन केला. या दौऱ्यातील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे.पेनिसिल्व्हेनियामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी केली. भारताच्या पूनम राणीने १९ व्या मिनिटाला, रेणुका यादवने ३२ व्या, तर अनुराधा थोकचोमने ५८ व्या मिनिटाला गोल केला.

भारताने सुरुवातीच्या काही मिनिटांतच आक्रमक खेळ करीत कॅनडाला बॅकफूटवर टाकले. रोव्हन हॅरिसने गोल करण्याचा केलेला प्रयत्न भारताच्या बचावफळीने हाणून पाडला. त्यानंतर पूनम राणीने पहिला गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली; मात्र लगेचच कॅनडाच्या नताली सुरेसियूने गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान, कॅनडाला पेनल्टी मिळाली; मात्र भारताने याचे रूपांतर गोलमध्ये होऊ दिले नाही. मध्यंतरापर्यंत १-१ अशी बरोबरी राहिली.

उत्तरार्धात भारतीय संघाने आपल्या खेळाला आणखी आक्रमकतेची जोड दिली. ३२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत रेणुकाने भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या दरम्यान भारताच्या दीप ग्रेसला गोल करण्याची संधी मिळाली होती; मात्र तिला याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. शेवटच्या काही मिनिटांत कॅनडाने वारंवार गोलपोस्टवर आक्रमण केले, मात्र भारताच्या बचावफळीने त्यांना गोल करू दिला नाही. सामना संपण्यासाठी दोन मिनिटे शिल्लक असताना भारताच्या अनुराधाने गोल करत भारताला ३-१ ने विजय मिळवून दिला. २६ जुलैला भारत- कॅनडा पुन्हा एकदा मैदानात भिडणार आहेत.