शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

नवे चॅनल काढणे शक्य नाही

By admin | Updated: February 20, 2015 01:49 IST

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काही सामन्यांच्या प्रसारणासाठी नवे चॅनल काढणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचे निवेदन प्रसार भारतीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केले.

नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काही सामन्यांच्या प्रसारणासाठी नवे चॅनल काढणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचे निवेदन प्रसार भारतीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केले. महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकार आणि प्रसार भारतीची बाजू मांडताना ट्रान्समीटर्सची संख्या मर्यादित असल्याने वेगळे चॅनल काढण्याची आमची स्थिती नाही, असा न्यायालयापुढे युक्तिवाद केला. न्या. रंजन गोगोई आणि न्या. प्रफुल्ल पंत यांच्या खंडपीठाने महाधिवक्त्याचे मत जाणून घेतल्यानंतर दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध प्रसार भारतीच्या अपिलावर नंतर निर्णय देणार असल्याचे सांगितले. दिल्ली हायकोर्टाने आपल्या आदेशात दूरदर्शनला विश्वकप सामन्यांचे लाईव्ह फिड खासगी केबल आॅपरेटर्सना देण्यास मज्जाव केला होता. रोहतगी म्हणाले, ‘प्रसार भारतीकडे देशभरात १४०० ट्रान्समीटर्स आहेत. यापैकी अनेक ट्रान्समीटर्स मानवरहित तसेच दुर्गम भागात आहेत. अशा स्थितीत वेगळे चॅनल सुरू करणे शक्य होणार नाही. विश्वचषकासाठी वेगळे चॅनल्स सुरू करण्याची स्टार इंडियाची सूचना फेटाळताना ते पुढे म्हणाले, की कायदे जनतेच्या हितासाठी आहेत.’ स्टार आणि केबल आॅपरेटर्स यांच्यात वाद असेल तर त्याचा फटका लोकांना का बसावा? सर्वांना सामना पाहण्याची संधी मिळायला हवी.’ स्टार इंडियाच्या वतीने ज्येष्ठ वकील पी. चिदम्बरम म्हणाले, ‘२०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी अशीच स्थिती उद्भवली होती. त्या वेळी सहा दिवसांच्या आत वेगळ्या चॅनल्सची व्यवस्था करण्यात आली, मग आता का होऊ शकत नाही? वेगळे चॅनल सुरू करण्यासाठी आम्ही प्रसारभारतीची मदत करू शकतो. तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देऊ शकतो. नवे चॅनल कुठलाही अतिरिक्त खर्च न करता दूरदर्शनसारखे त्याच फ्रिक्वेन्सीवर चालू शकेल.’ (वृत्तसंस्था)