शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नवे चॅनल काढणे शक्य नाही

By admin | Updated: February 20, 2015 01:49 IST

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काही सामन्यांच्या प्रसारणासाठी नवे चॅनल काढणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचे निवेदन प्रसार भारतीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केले.

नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काही सामन्यांच्या प्रसारणासाठी नवे चॅनल काढणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचे निवेदन प्रसार भारतीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केले. महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकार आणि प्रसार भारतीची बाजू मांडताना ट्रान्समीटर्सची संख्या मर्यादित असल्याने वेगळे चॅनल काढण्याची आमची स्थिती नाही, असा न्यायालयापुढे युक्तिवाद केला. न्या. रंजन गोगोई आणि न्या. प्रफुल्ल पंत यांच्या खंडपीठाने महाधिवक्त्याचे मत जाणून घेतल्यानंतर दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध प्रसार भारतीच्या अपिलावर नंतर निर्णय देणार असल्याचे सांगितले. दिल्ली हायकोर्टाने आपल्या आदेशात दूरदर्शनला विश्वकप सामन्यांचे लाईव्ह फिड खासगी केबल आॅपरेटर्सना देण्यास मज्जाव केला होता. रोहतगी म्हणाले, ‘प्रसार भारतीकडे देशभरात १४०० ट्रान्समीटर्स आहेत. यापैकी अनेक ट्रान्समीटर्स मानवरहित तसेच दुर्गम भागात आहेत. अशा स्थितीत वेगळे चॅनल सुरू करणे शक्य होणार नाही. विश्वचषकासाठी वेगळे चॅनल्स सुरू करण्याची स्टार इंडियाची सूचना फेटाळताना ते पुढे म्हणाले, की कायदे जनतेच्या हितासाठी आहेत.’ स्टार आणि केबल आॅपरेटर्स यांच्यात वाद असेल तर त्याचा फटका लोकांना का बसावा? सर्वांना सामना पाहण्याची संधी मिळायला हवी.’ स्टार इंडियाच्या वतीने ज्येष्ठ वकील पी. चिदम्बरम म्हणाले, ‘२०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी अशीच स्थिती उद्भवली होती. त्या वेळी सहा दिवसांच्या आत वेगळ्या चॅनल्सची व्यवस्था करण्यात आली, मग आता का होऊ शकत नाही? वेगळे चॅनल सुरू करण्यासाठी आम्ही प्रसारभारतीची मदत करू शकतो. तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देऊ शकतो. नवे चॅनल कुठलाही अतिरिक्त खर्च न करता दूरदर्शनसारखे त्याच फ्रिक्वेन्सीवर चालू शकेल.’ (वृत्तसंस्था)