शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

बट, आमिर, आसिफ यांना प्रामाणिकता सिद्ध करण्याचे फर्मान

By admin | Updated: September 3, 2015 22:36 IST

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरलेले पाकचे खेळाडू सलमान बट, मोहंमद आमिर आणि मोहंमद आसिफ यांच्यावरील ५ वर्षांची बंदी संपुष्टात आली;

कराची : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरलेले पाकचे खेळाडू सलमान बट, मोहंमद आमिर आणि मोहंमद आसिफ यांच्यावरील ५ वर्षांची बंदी संपुष्टात आली; पण संघात पुन्हा स्थान मिळवायचे झाल्यास या तिन्ही खेळाडूंंनी स्वच्छ चारित्र्याची प्रामाणिकता सिद्ध करावी, असे पीसीबीचे मुख्य निवडकर्ते हारून रशीद यांनी म्हटले आहे.हारून म्हणाले, ‘‘हे खेळाडू कसा खेळ करतात, हे महत्त्वाचे आहेच; पण त्याहूनची महत्त्वाचे हे, की तिघेही किती प्रामाणिक आणि जबाबदार झाले आहेत. तिघांसाठी लोकांच्या मनात स्थान निर्माण करणे कठीण आणि आव्हानात्मक असेल.’’आगामी झिम्बाब्वे दौरा व त्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी निवडकर्ते या तिघांच्या नावाचा मुळीच विचार करणार नाहीत. पीसीबीने तिघांना सुधारण्यास वाव दिला असल्याने तिघेही जानेवारीपर्यंत व्यस्त आहेत. त्यानंतर प्रथमश्रेणी सामने खेळण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरच आम्ही राष्ट्रीय संघात त्यांना स्थान देण्याचा विचार करू शकतो.’’ २०१०मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यादरम्यान तिन्ही खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले होते. त्यांच्यावर घातलेल्या बंदीचा कालावधी बुधवारी संपताच तिघांनीही लाहोरमध्ये नेट प्रॅक्टिस करून आनंद लुटला. मोहंमद आसिफ आणि सलमान बट हे नॅशनल टी-२० चॅम्पियनशिपमध्ये लाहोरकडून खेळणार आहेत. (वृत्तसंस्था)