शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीवर अपेक्षांचे ओझे : कालुवितरणा

By admin | Updated: August 9, 2015 22:46 IST

भारताचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली विजयासाठी उत्सुक दिसत आहे; पण त्याच्यावर अपेक्षांचे ओझेही आहे, असे मत श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज रोमेश कालुवितरणाने व्यक्त केले

कोलंबो : भारताचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली विजयासाठी उत्सुक दिसत आहे; पण त्याच्यावर अपेक्षांचे ओझेही आहे, असे मत श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज रोमेश कालुवितरणाने व्यक्त केले. कालुवितरणा म्हणाला,‘भारतात अपेक्षांचे दडपण अधिक असते. भारतात अनेकांना क्रिकेटमध्ये अधिक रुची आहे. कोहली कर्णधारपदाची जबाबदारी कशी निभावतो, याबाबत उत्सुकता आहे. कोहलीला हे अपेक्षांचे ओझे सांभाळावे लागणार आहे. नवा कर्णधार चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असतो व कोहली विजयासाठी भुकेला असल्याचे भासत आहे.’श्रीलंका ‘अ’ संघाचा प्रशिक्षक आणि तीन दिवसीय सराव सामन्यादरम्यान बोर्ड अध्यक्ष एकादशचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या कालुवितरणाने आगामी तीन कसोटी सामन्यांची मालिका श्रीलंका संघासाठी महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. कालुवितरणा म्हणाला, ‘श्रीलंकेसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. पाकिस्तानविरुद्धच्या यापूर्वीच्या मालिकेत आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पुनरागमन करण्यासाठी आमचा मार्ग आम्हालाच शोधावा लागणार आहे. भविष्यात संघाची वाटचाल कशी राहील हे या मालिकेनंतर निश्चित होईल. याव्यतिरिक्त श्रीलंका संघ दिग्गज फलंदाज संगकाराला मालिका विजयासाठी भेट देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.’ भारताने १२ आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या मालिकेपूर्वी एकमेव सराव सामना अनिर्णीत राखला. मालिकेसाठी या सामन्याच्या निकालाला विशेष महत्त्व नसल्याचे कालुवितरणा म्हणाला. भारताने सराव सामन्यात दोन्ही डावांत अनुक्रमे ३५१ व १८० धावा फटकावल्या. भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करताना अध्यक्ष एकादशचा पहिला डाव १२१ धावांत गुंडाळाला. भारतातर्फे अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली तर शिखर धवन, के. एल. राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे फलंदाजही धावा फटकावण्यात यशस्वी ठरले. भारतीय गोलंदाजांमध्ये विशेषत: ईशांत शर्मा व रविचंद्रन अश्विन यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली, पण फलंदाजीमध्ये रोहित शर्मा, कोहली व रिद्धिमान साहा यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पाच गोलंदाजांना संधी देण्याची रणनीती आखली आहे. कालुवितरणा म्हणाला, ‘भारतीय संघ गेल्या काही दिवसांपासून याच रणनीतीने खेळत आहे, त्यामुळे येथेही त्यांनी याच रणनीतीचा वापर केला तर आश्चर्य वाटणार नाही. (वृत्तसंस्था)