शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वन डे सामन्यात गोलंदाजांचे 'अच्छे दिन' परतणार ?

By admin | Updated: May 17, 2015 16:13 IST

वन डे सामन्यांमध्ये फलंदाजांवर लगाम लागण्याची चिन्हे असून क्षेत्ररक्षणाच्या नियमात बदल करण्याची शिफारस अनिल कुंबळे यांच्या समितीने केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १७ - वन डे सामन्यांमध्ये फलंदाजधार्जीण्या नियमांमुळे गोलंदाजांची यथेच्छ धुलाई होत असतानाच आता आयसीसीने एकदिवसीय सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षणाच्या नियमात बदल करुन गोलंदाजांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आयसीसीच्या समितीने वन डे सामन्यात शेवटच्या १० षटकात ३० यार्ड सर्कलच्या बाहेर ४ ऐवजी ५ खेळाडू ठेवण्याची शिफारस केली असून याशिवाय चेंडूची शिवणमध्येही बदल सुचवले आहेत. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास गोलंदाजांना मोठा दिलासा मिळू शकेल. 
आयसीसीने अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असून या समितीने आयसीसीकडे काही शिफारसी केल्या आहेत. समितीने वर्ल्डकपमधील सामन्यांचा आढावा घेतला असून यात नवखे संघही ५० षटकांच्या सामन्यात सहजपणे ३०० धावांचा टप्पा ओलांडताना दिसत होते. समितीने याची दखल घेत फलंदाजधार्जीण्या नियमांमध्ये बदल सुचवले आहेत. अंतिम १० षटकांमध्ये क्षेत्ररक्षणात ३० यार्ड सर्कलबाहेर चार ऐवजी पाच खेळाडू ठेवण्याची मूभा द्यावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस या समितीने केली आहे. सध्याच्या नियमानुसार सर्कल बाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक असल्याने फलंदाजांचा फायदा होतो. याशिवाय गोलंदाजांची चेंडूवरील पकड आणखी घट्ट व्हावी यासाठी चेंडूवरील शिवण वाढवावी असेही या समितीने म्हटले आहे. यामुळे फायदा फिरकी व जलदगती अशा दोन्ही गोलंदाजांना होऊ शकतो. तसेच बॅटच्या स्ट्रॉकसंदर्भातही नियम तयार करण्याची गरज असल्याचे मत समितीने मांडले आहे. येत्या काही दिवसांमध्ये आयसीसीची बैठक होणार असून या बैठकीत अनिल कुंबळे यांच्या समितीने दिलेला अहवाल मांडला जाईल. यातील शिफारशींना आयसीसीने मंजुरी दिली तर वन डे सामन्यात गोलंदाजांना मोठा दिलासा मिळू शकेल.