हेग : हॉकी वल्र्डकप स्पध्रेत स्पेनविरुद्ध सामना बरोबरीत रोखून भारताने आपले गुणाचे खाते उघडले. मात्र स्पध्रेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना केवळ एकाच गुणावर समाधानी राहणो महागात पडेल. त्यासाठी त्यांना मलेशियाविरुद्ध शनिवारी होणा:या लढतीत विजय मिळवावाच लागेल.
भारताला आता तुलनेने दुबळय़ा मलेशियावर विजय मिळवणो क्रमप्राप्त आहे. मलेशियाने तीन सामन्यांत पराभवाचचे तोंड पाहिले आहे आणि ते सहाव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे भारत पाचव्या स्थानावर आहे. या लढतीनंतर भारताला गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला करायचा आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात नऊ गुण जमा आहेत. वल्र्डकपच्या इतिहासात मलेशियाची कामगिरी साजेशी झालेली नाही आणि 1975 साली त्यांनी चौथे स्थान पटकावून सर्वोत्तम कामगिरी केली होती. याच वर्षी भारताने जेतेपद पटकावले होते.
भारताकडून मनदीप, आकाशदीप, धर्मवीर सिंह आणि रूपिंदर पाल सिंह यांनाच गोल करण्यात यश आले आहे आणि मलेशियाविरुद्धच्या लढतीत त्यांच्याकडूनच अपेक्षा असतील. याव्यतिरिक्त स्पेनविरुद्धच्या लढतीत गोलकीपर o्रीजेश यानेही दमदार कामगिरीचा नजराणा पेश केला होता. यांनी कामगिरीत सातत्य राखल्यास मलेशियावर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करून सामना आपल्या बाजूने झुकवणो भारताला शक्य होईल. (वृत्तसंस्था)
4भारताने गुरुवारी झालेल्या लढतीत स्पेनबरोबर 1-1 अशी बरोबरी करून आपल्या खात्यात एक गुण जमा केला. भारताने स्पेनला कडवी टक्कर देत गुण संपादन केला. या गुणाने भारतीय चमूचा आत्मविश्वास वाढला आहे आणि संघावरील प्रेक्षकांचा भरवसाही पुन्हा प्रस्थापित झाला.
4प्रशिक्षक टॅरी वॉल्श स्पेनविरुद्धच्या लढतीनंतर म्हणाले होते की, या सामन्यात गुण मिळणो हे आमच्यासाठी शुभ संकेत आहे. या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी जबरदस्त झाली आणि कोणताही संघ जिंकू शकत होता. परंतु आम्ही सामन्यावरील पकड जराही सुटू दिली नाही.