शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
2
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
6
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
7
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
8
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
9
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
10
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
11
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
12
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
13
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
14
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
15
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
17
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
18
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
19
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
20
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

भज्जीचे दोन वर्षांनी पुनरागमन

By admin | Updated: May 21, 2015 00:18 IST

गलादेश दौऱ्याच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात अनुभवी हरभजन सिंगची निवड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

बांगलादेश दौरा : एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात निवडमुंबई : गेल्या काही वर्षांपासून युवा खेळाडूंवर विश्वास दाखवणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीने आगामी होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात अनुभवी हरभजन सिंगची निवड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या अनपेक्षित निवडीने भज्जी दोन वर्षांहून अधिक काळानंतर पुन्हा एकदा भारताची जर्सी घालून मैदानात उतरेल. बुधवारी राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी १५ खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय कसोटी संघाची घोषणा केली.सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गोलंदाजीसहीतच आक्रमक फलंदाजी करून तो संघासाठी निर्णायक कामगिरी करीत आहे. तरी त्याची निवड आयपीएलच्या कामगिरीवरून न झाल्याचे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याविषयी अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, की यापूर्वीदेखील हरभजनच्या नावाची चर्चा झाली होती. हरभजनची निवड ही बांगलादेशच्या फलंदाजांची फळी पाहून करण्यात आली आहे. त्यांच्याकडे डावखुरे फलंदाज अधिक असून, हरभजन आपल्या अनुभवाच्या जोरावर चांगली कामगिरी करू शकेल. याविषयी आम्ही कर्णधार विराट कोहली सोबतदेखील चर्चा केली.हरभजनचा अपवाद वगळता संघामध्ये फारसा बदल दिसत नाही. मात्र, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला कसोटी संघातून डच्चू दिला आहे. तर, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून सावरत असलेल्या मोहम्मद शमीच्या जागी मुंबईकर धवल कुलकर्णीला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. याआधी बांगलादेश दौऱ्याकरिता अव्वल खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंवर जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानची झालेली वाताहत पाहता बीसीसीआय कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे या संघनिवडीवरून दिसत आहे. एकीकडे भज्जीची निवड होत असताना दुसरीकडे वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि युवराज सिंग या वरिष्ठ खेळाडूंचा विचारही झाला नाही. कर्णधार व निवड समितीने कामगिरी व तंदुरुस्तीनुसार खेळाडूंची निवड केली. युवराजविषयी चर्चा नाही झाली. कोणावर चर्चा झाली किंवा नाही हे सांगणे कठीण आहे, असे संदीप शर्मा म्हणाले. (क्रीडा प्रतिनिधी)कोणीही खेळापेक्षा मोठा नाही : अनुराग ठाकूरमुंबई : आयपीएल सामन्यादरम्यान प्रेयसी अनुष्का शर्मासोबत संवाद साधल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनाकडे खास महत्त्व न देता बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी कोणीही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसून, या प्रकरणी आचारसंहिता उल्लंघनाबाबतची चौकशी सुरू आहे.दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पावसामुळे खेळ थांबण्यात आल्यानंतर विराट कोहली व्हीआयपी बॉक्समध्ये बसलेल्या अनुष्कासोबत गप्पा मारताना दिसला. नियमानुसार कोणत्याही खेळाडूला डगआऊटमध्ये उपस्थित संघ सहकारीव्यतिरिक्त अन्य कोणाशीही बोलण्यास परवानगी नसताना कोहलीने या नियमाचा भंग केला. दरम्यान, कोहलीविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले.आयपीएल भ्रष्टाचार विरोधक नियमांनुसार या प्रकरणाची चौकशी होणार असून, कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही. खेळाच्या नियमानुसार चौकशी करण्यात येईल, असेही ठाकूर यांनी सांगितले. भज्जीने २०१३ साली हैदराबाद येथे आॅस्टे्रलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये भज्जी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भज्जीने एकूण १०१ कसोटी सामने खेळताना ४१३ बळी घेतले आहेत. ही माझ्यासाठी नवी सुरुवात आहे. माझ्या या नवीन इनिंगची सुरुवात मला आत्मविश्वासाने करायची असून, या संधीचे सोने करण्यासाठी मी सज्ज आहे. माझ्या गोलंदाजी शैलीत मी काही बदल केले असून, कमजोर बाजूवर अधिक मेहनत घेतली आहे. चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे हे शक्य झाले असून, संघात पुनरागमन करणे खूप महत्त्वाचे होते. या दिवसासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून मेहनत घेत होतो. मी कधीही भारतीय संघातील पुनरागमनासाठी आशा सोडली नव्हती.- हरभजन सिंग