शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

हेही नसे थोडके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 08:59 IST

काही गोष्टी मनाला फार हुरहूर लावून जातात. काल झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतरही मनाला अशीच हुरहुर लागली आहे.

बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत    
 काही गोष्टी मनाला फार हुरहूर लावून जातात. काल झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतरही मनाला अशीच हुरहुर लागली आहे. स्वप्नवत कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारणाऱ्या भारताच्या रणरागिणी  इंग्लंडमधून विश्वचषक आणतील, अशी अपेक्षा होती. त्यांनी यजमान इंग्लंडविरुद्ध झालेल्या फायनलमध्येही कामगिरीत सातत्य राखत जवळपास विश्वविजेतेपद खेचून आणले होते. पण शेवटी जे घडू नये तेच झाले. नशिबाने दगा दिला. खेळाडूंचा संयम सुटला आणि हातात आलेला विश्वचषक निसटला. गेल्या महिनाभरापासून घेतलेल्या कष्टाचे चीज नाही झाले. ज्यांनी ज्यांनी हा सामना पाहिला त्यांचे डोळे पाणावले. देश हळहळला. पण पराभूत होऊनही सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी आणि ज्यांचे क्रिकेटशी फार सौख्य नाही अशा मंडळींकडून महिला संघाने जे प्रेम मिळवले त्याला तोड नाही. हा अनेक वर्षे उपेक्षित राहिलेल्या भारतीय महिला क्रिकेटसाठी विश्वचषकापेक्षाही मोठा विजय आहे. 
 खरंतर विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी भारतीय संघाला कुणीही विजेतेपदाचा दावेदार मानत नव्हते. अगदी महिला क्रिकेट वर्षानूवर्षे पाहणारेही या संघाकडे संभाव्य विजेता म्हणून पाहत नव्हते. त्यामुळे सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना त्यांच्याकडून अपेक्षा असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण मिताली राजच्या धाकड गर्ल्सनी विश्वचषकात जो कारनामा केला तो स्वप्नवत होता. पात्रता फेरीचे दिव्य पार करून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवल्यानंतर त्यांनी पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडला दणका दिला. येथूनच वुमेन्स इन ब्ल्यू चर्चेत आली. मग महिनाभरात काय झाले त्याचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही. 
कधी नव्हे ते भारतीय महिला क्रिकेट चर्चेत आले. तसे ते आधीही होते. पण त्यावेळी पुरुष संघाच्या तुलनेत महिला क्रिकेटची चर्चा नगण्यच व्हायची. पण यंदाच्या विश्वचषकाने हे चित्र बदलले. मिताली राज आणि झूलन गोस्वामी वगळता बाकीच्या महिला क्रिकेटपटूं प्रसिद्धीच्या झोतात नव्हत्या. यावेळी मात्र स्मृती मंधाना, पूनम राऊत, हरमनप्रीत, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे चर्चेत आल्या. कॉलेजचे कट्टे असोत की लोकलमधील ग्रुप महिला क्रिकेटची कधी नव्हे तितकी चर्चा झाली.  थेट प्रक्षेपित झालेले सामनेही मोठ्या प्रमाणावर पाहिले गेले. सोशल मीडियावरही महिला क्रिकेट ट्रेंडमध्ये होते. चर्चा इतकी झाली की महिला क्रिकेटपटूंच्या दमदार कामगिरीच्या झंझावातात पुरुष संघात प्रशिक्षक पदावरून रंगलेले मानापमान नाट्य झाकोळले गेले.  
 एकूणच संघाने केलेली जबरदस्त कामगिरी आणि त्यांना मिळत असलेला पाठिंबा यामुळे लॉर्ड्सवर नवा इतिहास लिहिला जाणार. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिताली राज विश्वचषक उचलणार असेच वाटत होते. पण शेवटच्या क्षणी निराशा झाली. असो. पण महिला संघ ज्याप्रमाणे खेळला. जो लढाऊ बाणा त्यांनी आपल्या खेळात दाखवला. त्यामुळे सर्वांच्या मनात घर करण्यात त्या यशस्वी ठरल्यात. भारताच्या संदर्भात बघायचे झाले तर क्रिकेट हा पुरुषी खेळ. क्रिकेट खेळणाऱ्या महिला, मुली यांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत नगण्यच. तरीही भारतीय महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठतात हे कौतुकास्पद म्हटले पाहिजे. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय महिला क्रिकेटसाठी नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. क्रिकेट भारतात लोकप्रिय आहेच, पण त्यात महिला क्रिकेटपटूंनीही अशीच कामगिरी सातत्याने केल्यास भारतात महिला क्रिकेटही जबरदस्त लोकप्रियता मिळवेल. त्यामुळे मिताली राज आणि तिच्या सहकारी विश्वचषक जिंकूण आणण्यात अपयशी ठरल्या असल्या तरी त्यांनी महिला क्रिकेटमध्ये केलेली क्रांती भारतीय क्रिकेट आणि एकूणच क्रीडाक्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.