शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

गोलंदाजांच्या कामगिरीमुळे वाटतोय सर्वोत्तम कर्णधार

By admin | Updated: March 12, 2015 00:37 IST

विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्व गुणावर स्तुतिसुमनांची उधळण होत आहे; परंतु गोलंदाजांच्या

आॅकलंड : विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्व गुणावर स्तुतिसुमनांची उधळण होत आहे; परंतु गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे आपण सर्वोत्तम कर्णधार दिसत आहोत, असे यष्टीरक्षक फलंदाज धोनीने स्पष्ट केले आहे.आयर्लंडविरुद्ध गत सामन्यात ३0 षटकांपर्यंतची जबाबदारी फिरकी गोलंदाजांनी सांभाळली होती. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत संघात गोलंदाजांच्या पर्यायाची योग्यपणे हाताळणी केल्यामुळे कर्णधार म्हणून सर्वोत्तम कामगिरी होतेय का, असा प्रश्न धोनीला विचारण्यात आला. त्यावर धोनीने स्मित हास्य केले आणि तो म्हणाला, नाही. जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतात, तेव्हाच मी सर्वोत्तम कर्णधार दिसतो, असे उत्तर त्याने दिले.धोनी म्हणाला, की प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवण्यासाठी गोलंदाजांना एकाच लाइनवर गोलंदाजी करा, असे तुम्हाला सातत्याने त्यांना बजवावे लागते. आता त्यांनी पाहिले, अनुभवले आणि त्याविषयीची समज त्यांच्यात आली आहे, तसेच त्याचे महत्त्वही त्यांना पटले आहे. त्यामुळे जेव्हा ते पुन्हा कसोटी मालिकेसाठी उपखंडाबाहेर जातील तेव्हा त्यांना उपमहाखंडात जास्तीत जास्त वेळ आपली लाइन आणि लेंथवर लक्ष केंद्रित करावे लागेल, याचे स्मरण राहील आणि त्याचा फायदाही होईल. त्यामुळे निश्चितपणे आमच्यासाठी काही चांगले बदल होतील आणि आमच्याशी जितक्या समस्या जुळलेल्या आहेत, त्यावर तोडगा निघेल. आमच्या गोलंदाजांनी काही शिकले आहे आणि ही शिकवण ते पुढेही कायम ठेवतील, अशी आशा वाटते असेही धोनी म्हणाला. (वृत्तसंस्था)