शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खेळाडूंच्या बेशिस्तीमुळे महाराष्ट्राची पीछेहाट

By admin | Updated: July 18, 2014 02:32 IST

सध्या कबड्डीत होत असलेल्या महाराष्ट्राच्या पीछेहाटीला खेळाडूंचा बेशिस्तपणा कारणीभूत असून, अशा खेळाडूंवर व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर आचारसंहिता लावली जाईल

मुंबई : सध्या कबड्डीत होत असलेल्या महाराष्ट्राच्या पीछेहाटीला खेळाडूंचा बेशिस्तपणा कारणीभूत असून, अशा खेळाडूंवर व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर आचारसंहिता लावली जाईल, असे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी ‘कबड्डी दिना’निमित्त परखडपणे सुनावले. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त नुकताच तुळजापूर येथे कबड्डी दिन सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात पाटील बोलत होते. सध्या कबड्डीचे सामने मॅटवर घेणे अनिवार्य झाल्याने किशोर व कुमार गटातील खेळाडूंना जास्तीतजास्त मॅटवर सराव दिला पाहिजे. जेणेकरून मॅटवर आपण कोठे कमी पडतो हे कळेल व भविष्यात खुल्या गटासाठी महाराष्ट्राला अधिक खेळाडू लाभतील, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.‘सर्कल कबड्डी’ हा कबड्डीचा नवीन प्रकार जाणून घेऊन त्यात यश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे किनारपट्टी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळल्या जाणाऱ्या बीच कबड्डी प्रकारातदेखील महाराष्ट्राने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे सांगताना पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला कबड्डीतील गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे मतदेखील मांडले.दरम्यान, या वेळी दिवंगत बाबाजी जामसांडेकर, दिवंगत मुकुंद जाधव व कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या स्मरणार्थ कुमार व किशोर गटातील प्रत्येकी आठ अशा एकूण १६ खेळाडूंना ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच सांगलीच्या काशिलींग आडके याला मधू पाटील स्मृती पुरस्कार तर मुंबई उपनगरच्या अभिलाषा म्हात्रे हिला अरुणा साटम स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवाय यंदाच्या मोसमात राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद गुण मिळवणाऱ्या मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर ‘लोकमत’ (परभणी)चे जेष्ठ क्रीडा पत्रकार माधव शेजूळ यांचादेखील महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. (क्रीडा प्रतिनिधी)