शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

बीसीसीआयची एसजीएम स्थगित

By admin | Updated: July 12, 2017 00:37 IST

बीसीसीआयने विशेष आमसभा (एसजीएम) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयने विशेष आमसभा (एसजीएम) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन व त्यांच्या गटाने नियमांचा हवाला देत एसजीएम आयोजनावर आक्षेप नोंदवला आहे.सहा राज्य संघटनांच्या प्रतिनिधींनी बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांना पत्र लिहून सोमवारी बोलाविण्यात आलेली एसजीएम नियमानुसार नसल्याचे म्हटले आहे. आक्षेप नोंदविणाऱ्या राज्य संघटनांमध्ये तमिळनाडू क्रिकेट संघटना, अपात्र अधिकारी निरंजन शाह यांची सौराष्ट्र क्रिकेट संघटना, कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांची हरियाणा क्रिकेट संघटना, टी. सी. मॅथ्यू यांची केरळ क्रिकेट संघटना, गोवा क्रिकेट संघटना आणि कर्नाटक राज्य संघटना आदींचा समावेश आहे. काळजीवाहू अध्यक्ष खन्ना यांनी यापूर्वीच काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांना दिलेल्या पत्रामध्ये घटनेनुसार पाऊल उचलण्याची सूचना केली होती. या सर्व संघटनांच्या मते, बोर्डाच्या घटनेनुसार बीसीसीआयची विशेष आमसभा (एसजीएम) बोलविण्यासाठी किमान १० दिवसांपूर्वी सूचना देणे आवश्यक असते. बहुसंख्य संघटना तोडगा काढण्यासाठी एसजीएम बोलाविण्यास व बीसीसीआयच्या विशेष समितीतर्फे करण्यात आलेल्या शिफारशीनुसार लोढा समितीच्या तीन शिफारशींचा अपवाद वगळता उर्वरित शिफारशी लागू करण्याच्या बाजूने आहेत. श्रीनिवासन विरोधी गटाच्या मते, दिवंगत जगमोहन दालमिया यांनी डिसेंबर २००२ मध्ये केवळ दोन दिवसांच्या नोटीसवर एसजीएम बोलाविली होती. पण यात सहभागी झालेले बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले, ‘दालमिया यांनी बैठक बोलाविली होती, पण त्यासाठी सर्व सदस्यांची सहमती होती. पण येथे अनेक संघटनांनी आक्षेप नोंदविला आहे. बैठक आयोजित करण्यात आली तर या सर्व संघटना न्यायालयाचे दार ठोठावतील आणि घेतलेल्या निर्णयावर स्टे मिळवू शकतील.’ पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार एसजीएम सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता होणार होती. (वृत्तसंस्था)