शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

बीसीसीआयला फटकारले

By admin | Updated: April 6, 2016 04:38 IST

क्रिकेटमधील सर्वोच्च संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाच्या विकासासाठी कुठलेच पाऊल उचलले नाही

नवी दिल्ली : क्रिकेटमधील सर्वोच्च संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाच्या विकासासाठी कुठलेच पाऊल उचलले नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना स्पष्ट केले की, सदस्यांनी बोर्डाला केवळ लाभ मिळवून देणारी संघटना बनवून ठेवले आहे. बीसीसीआयचा कारभार सुधारण्यासाठी न्या. आर. एम. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २०१३ च्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सट्टेबाजी व मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयाने या समितीची स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या वकिलांना ठणकावताना, ‘शिफारशी लागू करता येणार नाही, यासाठी न्यायालयात युक्तिवाद करूच नका,’ असे बजावले.दरम्यान, गेल्या ४ जानेवारी रोजी लोढा समितीने आपला दुसरा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्यात आणखी काही शिफारशींचा उल्लेख आहे. त्यात क्रिकेटमध्ये भारतात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याच्या शिफारशींचाही उल्लेख आहे. लोढा समितीने बीसीसीआयमध्ये आमूलाग्र बदल व सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. त्यात महत्त्वाच्या पदावरील पदाधिकाऱ्यांचा कालावधी, सरकारी अधिकारी व मंत्री यांना बोर्डाच्या कार्यकारिणीमध्ये स्थान न देणे, त्याचप्रमाणे बोर्डाच्या दैनंदिन कार्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती यासारख्या काही मुद्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त समितीने बोर्डाला माहितीच्या अधिकाराखाली आणण्याची शिफारस केली आहे. (वृत्तसंस्था)> च्बीसीसीआयतर्फे विविध राज्य संघटनांवर होत असलेल्या भेदभावाबाबत न्यायालयाने टीका केली. च्न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर व न्यायमूर्ती एफएमआय खलीफुल्ला यांच्या पीठाने म्हटले की,‘जाणकार व अनेकांसोबत चर्चा केल्यानंतर निष्कर्ष काढला गेला आहे. या शिफारशी भारताचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीशांनी केल्या असून, अनुभवानंतर ते निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत.’ च्बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेताना लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्या असल्याचे म्हटले होते; पण शिफारशी लागू करताना अडचणी भासत असल्याचे कारण दिले होते. शिफारशी लागू केल्या तर बोर्डाचे संचालन करताना प्रभाव पडणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले होते. च्बीसीसीआयच्या गेल्या पाच वर्षांतील जमा-खर्च विवरणावर पीठाने म्हटले की, ‘२९ पैकी ११ राज्यांना एक पैसाही दिलेला नाही. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल भासत नाही. काही राज्यांना भरघोस पैसा देण्यात येत असून, त्याचा हिशेबही मागण्यात येत नाही. मोठ्या रकमेच्या खर्चाबाबत स्पष्टीकरण मागण्यात येत नसल्यामुळे लोकांना तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या भ्रष्ट करीत आहात.’