शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

बीसीसीआयला फटकारले

By admin | Updated: April 6, 2016 04:38 IST

क्रिकेटमधील सर्वोच्च संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाच्या विकासासाठी कुठलेच पाऊल उचलले नाही

नवी दिल्ली : क्रिकेटमधील सर्वोच्च संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाच्या विकासासाठी कुठलेच पाऊल उचलले नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना स्पष्ट केले की, सदस्यांनी बोर्डाला केवळ लाभ मिळवून देणारी संघटना बनवून ठेवले आहे. बीसीसीआयचा कारभार सुधारण्यासाठी न्या. आर. एम. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २०१३ च्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सट्टेबाजी व मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयाने या समितीची स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या वकिलांना ठणकावताना, ‘शिफारशी लागू करता येणार नाही, यासाठी न्यायालयात युक्तिवाद करूच नका,’ असे बजावले.दरम्यान, गेल्या ४ जानेवारी रोजी लोढा समितीने आपला दुसरा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्यात आणखी काही शिफारशींचा उल्लेख आहे. त्यात क्रिकेटमध्ये भारतात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याच्या शिफारशींचाही उल्लेख आहे. लोढा समितीने बीसीसीआयमध्ये आमूलाग्र बदल व सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. त्यात महत्त्वाच्या पदावरील पदाधिकाऱ्यांचा कालावधी, सरकारी अधिकारी व मंत्री यांना बोर्डाच्या कार्यकारिणीमध्ये स्थान न देणे, त्याचप्रमाणे बोर्डाच्या दैनंदिन कार्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती यासारख्या काही मुद्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त समितीने बोर्डाला माहितीच्या अधिकाराखाली आणण्याची शिफारस केली आहे. (वृत्तसंस्था)> च्बीसीसीआयतर्फे विविध राज्य संघटनांवर होत असलेल्या भेदभावाबाबत न्यायालयाने टीका केली. च्न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर व न्यायमूर्ती एफएमआय खलीफुल्ला यांच्या पीठाने म्हटले की,‘जाणकार व अनेकांसोबत चर्चा केल्यानंतर निष्कर्ष काढला गेला आहे. या शिफारशी भारताचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीशांनी केल्या असून, अनुभवानंतर ते निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत.’ च्बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेताना लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्या असल्याचे म्हटले होते; पण शिफारशी लागू करताना अडचणी भासत असल्याचे कारण दिले होते. शिफारशी लागू केल्या तर बोर्डाचे संचालन करताना प्रभाव पडणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले होते. च्बीसीसीआयच्या गेल्या पाच वर्षांतील जमा-खर्च विवरणावर पीठाने म्हटले की, ‘२९ पैकी ११ राज्यांना एक पैसाही दिलेला नाही. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल भासत नाही. काही राज्यांना भरघोस पैसा देण्यात येत असून, त्याचा हिशेबही मागण्यात येत नाही. मोठ्या रकमेच्या खर्चाबाबत स्पष्टीकरण मागण्यात येत नसल्यामुळे लोकांना तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या भ्रष्ट करीत आहात.’