शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

बीसीसीआयपुढे आयसीसीचे नमते

By admin | Updated: September 8, 2016 04:30 IST

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डापुढे (बीसीसीआय) नमते घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) द्विस्तरीय कसोटीचा वादग्रस्त प्रस्ताव चर्चेआधीच मागे घेतला.

नवी दिल्ली : जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डापुढे (बीसीसीआय) नमते घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) द्विस्तरीय कसोटीचा वादग्रस्त प्रस्ताव चर्चेआधीच मागे घेतला.बीसीसीआयने प्रस्तावास विरोध केल्यानंतर श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बांगलादेश बोर्डाने सुरात सूर मिळविला होता. तब्बल चार बोर्डांचा कडवा विरोध परवडणारा नाही, हे लक्षात येताच सीईओंच्या दोन दिवसांच्या बैठकीपूर्वीच प्रस्ताव बुधवारी मागे घेण्यात आला. यावर नव्याने विचार करण्यात येईल, इतकेच प्रस्ताव मागे घेताना सांगण्यात आले. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर सुरुवातीपासून या प्रस्तावाच्या विरोधात होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत बोर्डासाठी ही पद्धत मारक तसेच प्रतिगामी असल्याचे त्यांचे मत होते. ठाकूर यांनी आज आयसीसीच्या भूमिकेचे स्वागत केले. आयसीसी सदस्यांंनी गांभीर्य ओळखून प्रस्ताव मागे घेतला याचे मी स्वागत करतो. प्रमुख बोर्ड म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालण्याची बीसीसीआयची भूमिका आहे. क्रिकेटचे हित वगळून कुठलीही तडजोड नाही. लोकप्रियता आणि विकास खुंटेल, अशा कुठल्याही गोष्टींना आम्ही पाठिंबा देणार नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले.बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी आयसीसीचे आभार मानले. राहुल जोहरी यांनी द्विस्तरीय कसोटी क्रिकेटमुळे कसे नुकसान होऊ शकते, हे आयसीसीला पटवून देण्यात मोलाची भूमिका वठविली आहे. आयसीसीला कुठल्याही पद्धतीचा पायाभूत बदल करायचा झाल्यास दोन तृतीयांश बहुमताची गरज भासते. दहापैकी सात मते त्यांना आपल्या बाजूने हवी होती; पण चार सदस्य देश विरोधात गेल्याने आयसीसीने नमते घेतले. नेहमी सोबत असणारे इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया बोर्ड आयसीसीकडेच असले तरी विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सुरात सूर मिळविण्याचे ठरविल्याने आयसीसीला हा प्रस्ताव पारित करणे कठीण होऊन बसले असते. विंडीज बोर्ड चार दिवसांची कसोटी आणि दिवस-रात्रीचा कसोटी सामन्याच्या बाजूने असले तरी कसोटी क्रिकेटमधील संघांची दोन गटात विभागणी करणे आपल्याला मान्य नसल्याचे विंडीज बोर्डाचे मत होते. (वृत्तसंस्था)