शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

बीसीसीआयने सुधारावे; अन्यथा आम्ही सुधरवू

By admin | Updated: September 29, 2016 04:33 IST

आपण सुचविलेल्या शिफारशींकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या कारणावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विरोधात निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने सर्वोच्च

नवी दिल्ली : आपण सुचविलेल्या शिफारशींकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या कारणावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विरोधात निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बीसीसीआयला चांगलेच धारेवर धरून मिळालेल्या आदेशांचे पालन करण्याबाबत खडसावताना ‘बीसीसीआयने वेळीच सुधारावे; अन्यथा आम्ही तुम्हाला सुधरवू,’ असे सुनावले. त्याचप्रमाणे, लोढा समितीने अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पदावरून हटविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे सादर केलेल्या आपल्या स्थिती अहवालामध्ये क्रिकेट प्रशासकांपासून क्रिकेट संस्थांच्या अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी केली आहे. समितीने सांगितल्याप्रमाणे, बीसीसीआय आणि त्यांचे पदाधिकारी सुचविलेल्या शिफारशींचे पालन करीत नाहीत; शिवाय पुन:पुन्हा निवेदन जाहीर करताना न्यायालयाच्या व लोढा समिती सदस्यांच्या अधिकारांना कमी लेखत आहेत. त्याचप्रमाणे, ई-मेल आणि अन्य मार्गाने साधलेल्या संपर्काला बीसीसीआय उत्तर देत नसून, सातत्याने न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करीत आहे, असेही लोढा समितीच्या वकिलाने सांगितले.लोढा समितीने दिलेल्या अहवालानंतर सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने सांगितले, की हा गंभीर आरोप असून बीसीसीआयला न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य आहे. न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले, ‘‘जर बीसीसीआय न्यायालयापेक्षा स्वत:ला मोठे समजत असेल, तर ते चुकीचे आहे. त्यांना न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावेच लागेल.’’‘‘बीसीसीआय देव असल्याप्रमाणे व्यवहार करीत आहे. आदेशाचे पालन नका करू, नाही तर आम्ही तुम्हाला आदेशाचे पालन करण्यास भाग पाडू. मिळालेल्या आदेशाचे पालन न करून बीसीसीआय व्यवस्थेची बदनामी करीत आहे,’’ असेही या वेळी खंडपीठाने सांगितले. याच वेळी बीसीसीआयच्या बाजूने उपस्थिती असलेले वरिष्ठ वकील अरविंद दातार यांनी बीसीसीआयने अधिकतर आदेशांचे पालन केले असून, हळूहळू इतर आदेशांचेही पालन करेल, असे सांगितले. यावर खंडपीठाने सांगितले, ‘‘कायद्याचा अपमान झाला नाही पाहिजे. ज्याप्रकारे कार्य सुरू आहे, त्यावर आम्ही समाधानी नाही. आम्हाला बीसीसीआयच्या याच भूमिकेची अपेक्षा होती; परंतु असे झाले नाही पाहिजे. तुम्हाला न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावेच लागेल.’’ (वृत्तसंस्था)बीसीसीआयला पुरेसा वेळ देण्यात आला होता : आर. एम. लोढाबीसीसीआयला लोढा समितीद्वारे सुचविण्यात आलेल्या शिफारशींवर विचारविनिमय करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला, असे निवृत्त न्या. आर. एम. लोढा यांनी म्हटले. लोढा यांनी सांगितले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश अंतिम असतो. ज्या काही शिफारशी बीसीसीआयला मान्य नव्हत्या, त्यांना विरोध झाला आणि त्यांना पूर्ण संधी मिळाली. सर्व बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारले, की कोणाच्याही गुणवत्तेला आणि क्षमतेला कमी लेखता येणार नाही. आपण सर्व सर्वोच्च न्यायालयापुढे नतमस्तक आहोत.’’त्याचप्रमाणे, ‘‘या विषयावर बीसीसीआयशी पुढील चर्चेचा प्रश्नच येत नसून आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना लागू करीत आहोत,’’ असेही लोढा यांनी सांगितले. ‘‘आम्ही ९ आॅगस्टला बीसीसीआय पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली होती. तसेच, या बैठकीआधी अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना सूचनाही दिली होती. आम्ही चर्चा करू इच्छित होतो. आम्ही स्वत:हून त्यांना निमंत्रित केले होते; परंतु त्या वेळी केवळ शिर्के आले होते, ठाकूर यांची अनुपस्थिती होती,’’ असे लोढा यांनी सांगितले. निवड समितीवर होणार परिणाम?लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या अहवालानंतर टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर बीसीसीआय शुक्रवारी होणाऱ्या आपल्या विशेष सर्वसाधारण सभेत वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीत बदल करण्याची शक्यता आहे. यामध्ये निवडकर्ता गगन खोडा, जतिन परांजपे यांना हटविण्यात येण्याची चिन्हे आहेत.लोढा समितीच्या शिफारशींचे थेट उल्लंघन होत असल्याच्या कारणावरून खोडा व परांजपे यांचे निलंबन जवळपास निश्चित आहे. दोन्ही निवडकर्त्यांनी एकही आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळलेला नसून, लोढा समितीच्या शिफारशीनुसार निवड समितीतील प्रत्येक सदस्याला कसोटी अनुभव अनिवार्य आहे. तसेच, विद्यमान निवड समिती ५ सदस्यांची असून लोढा समितीने ही समिती ३ सदस्यांची असण्याबाबत शिफारस केली होती. आम्हाला कोणत्याही व्यक्तीशी किंवा नावाशी काहीही देणंघेणं नाही. आमची अशी मागणी आहे, की विद्यमान पदाधिकाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी मध्यस्थी समितीची नियुक्ती व्हावी. बीसीसीआयचे कामकाज पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हटविले गेले पाहिजे.- आर. एम. लोढा