शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयने घटना बदलावी

By admin | Updated: May 4, 2016 04:04 IST

बीसीसीआयची सध्याची घटना पारदर्शी, निष्पक्ष आणि जबाबदार नसल्यामुळे या तिन्ही गोष्टी अंगीकारण्यासाठी घटनाबदल करावा. घटनाबदल करण्यास बीसीसीआय स्वत: सक्षम आहे

नवी दिल्ली : बीसीसीआयची सध्याची घटना पारदर्शी, निष्पक्ष आणि जबाबदार नसल्यामुळे या तिन्ही गोष्टी अंगीकारण्यासाठी घटनाबदल करावा. घटनाबदल करण्यास बीसीसीआय स्वत: सक्षम आहे. घटनेत बदल केल्यानंतरच उपरोक्त तिन्ही उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.मुख्य न्यायमूर्ती तीरथसिंह ठाकूर आणि न्या. एफ. एम. कलिफुल्ला यांच्या पीठाने हे निरीक्षण नोंदविताना ‘बीसीसीआयचे सध्याचे संविधान पारदर्शीपणा, निष्पक्षपणा आणि जबाबदारीची जाणीव ही तिन्ही मूल्ये राबविण्यात अपयशी ठरले असून, सध्याच्या घटनेत बदल करण्याशिवाय तिन्ही गोष्टींचा स्वीकार शक्य नाही,’ असे नमूद केले.पीठाने न्यायालय मित्र नेमलेले ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी क्रिकेट बोर्ड सार्वजनिक काम करीत असल्याने बोर्डाने ही तिन्ही मूल्ये राबवायला हवीत; ती राबविण्यात अपयशी ठरलेल्या बीसीसीआयला अवैध ठरविण्यात यावे, असे मत व्यक्त करतानाच पीठाने हे निरीक्षण नोंदविले. पीठाचे मत असे, की तुम्ही (बीसीसीआय) सार्वजनिक काम करता; मात्र खासगी दर्जादेखील कायम ठेवू इच्छिता. तुमचे काम सार्वजनिक असेल, तर खासगी दर्जा गमवावा लागेल. देशासाठी राष्ट्रीय संघ निवडणारे बोर्ड खासगी संस्था असूच शकत नाही. तुमचा हा सार्वजनिक उपक्रम आहे.’पायाभूत बदलाच्या शिफारशींचे समर्थन करीत सुब्रमण्यम यांनी बीसीसीआयने सर्वाजनिक हित जोपासले असते, तर या शिफारशींची गरजही भासली नसती, असे कोर्टापुढे सांगितले. संस्थेचे पावित्र्य कायम राखण्यासाठी संवैधानिक मूल्ये स्वीकारावीच लागतील. न्या. लोढा समितीच्या शिफारशी तुमच्या हिताच्याच आहेत. या शिफारशी लागू केल्यास बीसीसीआयची विश्वासार्हता वाढणार आहे. पीठाने सुब्रमण्यम यांना प्रश्न विचारला, की तुम्ही दोन्ही टोके एकत्र कशी आणू शकता? कारण ज्या राज्यांना आधी मतदानाच अधिकार होता, त्यांचा अधिकार जाणार आणि ज्यांना नव्हता त्यांना मिळणार. यावर सुब्रमण्यम म्हणाले, ‘‘प्रत्येक राज्याला बरोबरीची संधी मिळायला हवी. आयपीएलच्या संचालन परिषदेत आणखी पारदर्शीपणा आणण्यासाठी संघांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात यावे.’’सट्टेबाजीला कायदेशीर वैधता देण्याचे सुब्रमण्यम यांनी समर्थन केले आहे. यावर पीठाने बीसीसीआयकडून उत्तर मागितले. बोर्डाकडून युक्तिवाद करणारे अ‍ॅड. के. के. वेणुगोपाल म्हणाले, ‘‘सट्टेबाजी वैध करण्यासाठी कायदा पारित करावा लागेल. बीसीसीआय याच्याशी सहमत नाही. सट्टेबाजीसंदर्भात प्रत्येक राज्याचा वेगळा कायदा आहे. व्यावहारिकदृष्ट्या हे काम अडचणीचे आहे.’’ (वृत्तसंस्था)