शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

बीसीसीआयने क्रिकेटची विश्वासार्हता जपावी

By admin | Updated: July 23, 2015 16:35 IST

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी ही क्रिकेटची काळी बाजू असल्याचे मत व्यक्त करीत शैलीदार माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने

मुंबई : आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी ही क्रिकेटची काळी बाजू असल्याचे मत व्यक्त करीत शैलीदार माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने बीसीसीआयने क्रिकेटचे पावित्र्य कायम ठेवण्याच्या हिताचे काम करावे, असा सल्ला दिला आहे. क्रिकेट खेळात पारदर्शीपणा असावा आणि क्रिकेट चालविणाऱ्या लोकांनी विश्वासार्हता जपावी, असेही लक्ष्मण म्हणाला.लोढा समितीच्या निर्णयावर तुझे मत काय, असे विचारताच टाइम्स चॅनेल्सशी बोलताना लक्ष्मण म्हणाला, ‘‘आयपीएल सट्टेबाजी प्रकरण दुर्दैवी आहे. बीसीसीआय खेळाचे पावित्र्य जपण्यासाठी काम करेल, असा विश्वास वाटतो.’’ बोर्डाने लोढा समितीच्या निकालावर विचार करण्यासाठी एका कार्यसमूहाची स्थापना केली. अशा प्रकरणांमुळे लोकांचा आयपीएलबद्दलचा उत्साह कमी होईल का, असे विचारले असता लक्ष्मण म्हणाला, ‘‘कुणीही खेळापेक्षा मोठे नाही. अखेर विजय खेळाचाच होतो. हा ‘बॅडपॅच’ होता. बीसीसीआय खेळात स्वच्छता आणेल,’’ असा मला विश्वास वाटतो. ‘‘आयपीएल चांगली लीग असून खेळासाठी अशी स्पर्धा सुरू राहणे आवश्यक आहे. खेळाडूंचे लक्ष क्रिकेटवर असणे गरजेचे आहे,’’ असे लक्ष्मण म्हणाला. (वृत्तसंस्था)