शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

बीसीसीआयला नकोय ‘हॉक आय’

By admin | Updated: August 31, 2016 19:51 IST

पायचितच्या निर्णयासाठी वापरण्यात येणारे ‘हॉक आय’ तंत्र विश्वासार्ह नसल्यामुळे हे तंत्र नकोय, या शब्दात बीसीसीआयने विरोध दर्शविला आहे. पंचांच्या निर्णयाची समीक्षा

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३१ -  पायचितच्या निर्णयासाठी वापरण्यात येणारे ‘हॉक  आय’ तंत्र विश्वासार्ह नसल्यामुळे हे तंत्र नकोय, या शब्दात बीसीसीआयने विरोध दर्शविला आहे. पंचांच्या निर्णयाची समीक्षा प्रणाली(डीआरएस) मात्र काही बदलांसह स्वीकारण्याची आमची तयारी असेल, असे बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बुधावारी स्पष्ट केले.क्रिकेट सामन्यातील काही सुधारणांसह डीआरएस स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत पण पायचितच्या निर्णयासाठी असेलले ‘हॉक आय’ हे तंत्र आम्हाला मान्य नाही.डीआरएसमधील काही नियम चांगले पण काही मुळीच स्वीकारार्ह नसल्याने यातीलचांगले नियम स्वीकारण्याची आमची तयारी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.फ्लोरिडा येथे भारत-विंडीज यांच्यात झालेल्या दोन टी-२० दरम्यान उपस्थित राहिलेले ठाकूर ‘क्रिकइन्फो’शी बोलताना म्हणाले,‘हॉक आय’ प्रणाली शंभर टक्के विश्वासार्ह नसल्याने आम्ही या प्रणालीचे समर्थन करणार नाही. ‘हॉटस्पॉट’आणि ‘स्रिको’सारख्या प्रणालीच्या वापराबद्दल मात्र त्यांनी सकारात्मकता दाखविली. आयसीसीने काही महिन्यांआधी बोस्टनमध्ये एमआयटी तज्ज्ञांना डीआरएस प्रणालीची समीक्षा करण्यास तसेच त्याच्या प्रभावाबद्दलचा अहवाल मागितला होता. भारतीय संघाचे सध्याचे कोच आणि आयसीसी क्रिकेट समिती प्रमुख अनिल कुंबळे हे या समितीत आहेत. आयसीसीकार्यकारी समिती अहवालाची समीक्षा करणार आहे. बीसीसीआय डीआरएसच्या काही वादग्रस्त निर्णयावर चर्चा करण्यास तयार आहे.बीसीसीआय प्रमुख पुढे म्हणाले,‘आयसीसीला मी आधीही विचारणा केली की डीआरएस शंभर टक्के विश्वसनीय आहे काय, त्यांचे उत्तर होते नाही. मी नंतर विचारले की सुधारणेस वाव आहे काय, तेव्हा उत्तर आले होय! एमआयटी यावर अहवाल देणारआहे पण सध्यातरी आम्ही पूर्णपणे आश्वस्त नाही.बीसीसीआयने डीआरएसचा वापर आयपीएलमध्ये करण्याचे ठरविले होते. ठाकूर यांनी भविष्यात डीआरएसचा वापर स्थानिक आणि आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये करण्याचा विचार होऊ शकतो. पण पायचितच्या निर्णय तंत्रातील उणिवा दूर होईपर्यंत हॉकआय स्वीकारण्याचा प्रश्नच नाही. पायचितचा निर्णय वगळून डीआरएसचा वापर करण्यास बीसीसीआयची हरकत नाही, हे मी आधीही म्हटले आहे. मानवी चुका होत आहेत पण मशीनने त्याच चुकांची पुनरावृत्ती केल्यास तंत्राचा वापर खेळासाठी उपयुक्त ठरेल का, हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा, असे सांगितले.

चार दिवसांची कसोटी व्यवहार्य नाही!कसोटी हा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी पाच ऐवजी चार दिवसांचा सामना केला तरी कुठलाही तोडगा निघणार नसल्याची प्रतिक्रिया बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली.कसोटी सामन्यांचे दिवस कमी करून काही साध्य होणार नाही. उलट कसोटी क्रिकेटमधील उणिवा दूर करण्यावर भर द्यायला हवा. कसोटी पाहण्यासाठी लोकांची गर्दी का उसळत नाही, यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा. हॉकी, फुटबॉल, रग्बी आणि टी-२० क्रिकेट देखील दोन किंवा तीन तासांत संपतात. उलट कसोटी सामने तासन्तास चालतात हे मूळ कारण आहे. चाहत्यांना एकाच जागी बसायला आपण भाग पाडू शकत नाही. त्यांना काय पहायला आवडेल ही त्यांची चॉईस आहे.दिवस-रात्रीची कसोटी खेळविण्याबाबत विचारताच ठाकूर यांनी सध्यातरी तसा विचार नसल्याचे सांगितले. सध्या ट्रायल सुरू असून भारतीय परिस्थितीत गुलाबी चेंडूचा वापर प्राभावी आहे काय, याची समीक्षा होईल, असे ते म्हणाले.