शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लोढा पॅनेलपुढे बीसीसीआयची बाजू मार्कंडेय काटजू मांडणार

By admin | Updated: August 3, 2016 04:12 IST

माजी न्या. मार्कंडेय काटजू यांना बीसीसीआयने लोढा पॅनलपुढे स्वत:ची बाजू मांडण्यासाठी कायदेशीर पॅनलच्या चार सदस्यीय समितीचे प्रमुख नेमले आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. मार्कंडेय काटजू यांना बीसीसीआयने लोढा पॅनलपुढे स्वत:ची बाजू मांडण्यासाठी कायदेशीर पॅनलच्या चार सदस्यीय समितीचे प्रमुख नेमले आहे.सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या सुधारणा कशा लागू करता येतील, याबद्दल काटजू आणि त्यांचा चमू मार्गदर्शन करणार आहे. बीसीसीआयने मंगळवारी झालेल्या कार्य समितीच्या बैठकीत काटजू यांना चर्चेसाठी माध्यम बनविण्याचा निर्णय घेतला. काटजू हे लोढा समितीशी चर्चा करतील शिवाय जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्डाला योग्य सल्ला देतील. काटजू यांच्याशिवाय या पॅनलमध्ये कायदेतज्ज्ञ अभिनव मुखर्जी यांचा देखील समावेश असेल. काटजू हे २००६ ते २०११ या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. याशिवाय प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे चेअरमन राहिले. दिल्ली, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व अलाहाबाद हायकोर्टाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती देताना सांगितले की, लोढा समितीच्या शिफारशी लागू केल्यानंतर होणाऱ्या अडचणी आणि बदल याची माहिती देणारी तसेच कायदेशीर भाषा समजावून सांगणारी व्यक्ती बीसीसीआयला हवी होती. याकारणास्तव बीसीसीआयने काटजू यांना पॅनल प्रमुख बनण्याचा आग्रह केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे अनिवार्य होऊन बसले. पुढील सहा महिन्यात शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी लोढा समिती सहकार्य करण्यास तयार आहे. बीसीसीया अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर सांगितले की, ‘‘सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिवर्तन करण्याची गरज आहे.’’ (वृत्तसंस्था)