शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआय संकटात : अनुराग ठाकूर

By admin | Updated: December 24, 2016 01:17 IST

‘बीसीसीआय’वरील लोढा पॅनलच्या शिफारशींचे संकट क्रिकेटपटूंना हितावह नसल्याची कबुली देत बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर

नवी दिल्ली : ‘बीसीसीआय’वरील लोढा पॅनलच्या शिफारशींचे संकट क्रिकेटपटूंना हितावह नसल्याची कबुली देत बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय नसल्याचे म्हटले आहे. ३ जानेवारीला कोर्टाचा निर्णय येणार आहे. ठाकूर हे प्रो-कुस्ती लीगसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ते म्हणाले, ‘सद्य:स्थिती क्रिकेटपटूंना हितावह नाही, याची मला जाणीव आहे. बीसीसीआय संकटात असून, ३ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या माजी सरन्यायाधीश आर. एन. लोढा यांच्या पॅनलच्या शिफारशींचा उल्लेख करीत त्यांनी वरील वक्तव्य केले. बोर्डाने लोढा समितीच्या काही शिफारशी मान्य नसल्याची भूमिका घेतल्याने अंतिम निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे. काही माजी पदाधिकाऱ्यांनी बोर्डावर टीका केल्याप्रकरणी लक्ष वेधताच ठाकूर म्हणाले, ‘बीसीसीआयने सरकारकडून एकही छदाम न घेता स्वत:ची पायाभूत सुविधा उभारली. तरीसुद्धा काहीजण आमच्यावर तोंडसुख घेतात.’बीसीसीआय एक लाख पंचायतींपर्यंत एक लाख कोचेस का पाठवित नाही, या प्रश्नाच्या उत्तरात ठाकूर हसून म्हणाले, ‘आमच्याकडे खूप पैसा आहे; पण आम्ही तो खर्च करू शकत नाही. यासाठी परवानगीची गरज आहे.’ सर्वोच्च न्यायालयाने बोर्डावर निधी देण्यास निर्बंध घातले आहेत.आयसीसी कार्यकारी ग्रुपमध्ये भारताचा समावेश न केल्याबद्दल ठाकूर यांनी ‘आयसीसी’चीदेखील खिल्ली उडविली. ते म्हणाले, ‘मी बैठकीत होतो. विश्व क्रिकेट बलाढ्य करायचे झाल्यास बीसीसीआयची गरज असल्याचे प्रत्येक सदस्याचे मत होते. बीसीसीआयविना हे काम होऊ शकेल, असे कुणाला वाटत असेल, तर बीसीसीआयविना विश्व क्रिकेट प्रगती करू शकत नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. (वृत्तसंस्था)