शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

बीसीसीआय योग्य प्रक्रियेचा अवलंब करीत आहे

By admin | Updated: May 26, 2017 03:34 IST

मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) योग्य प्रक्रियेचे पालन करीत आहे.

लंडन : ‘मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) योग्य प्रक्रियेचे पालन करीत आहे. कारण, विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर समाप्त होत आहे,’ असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने गतमोसमात १७ कसोटी सामन्यांपैकी १२ सामने जिंंकले आहेत. तरी, बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी आवेदन मागण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर एक गोष्ट निश्चित झाली आहे, की अनिल कुंबळे यांच्या कार्यकाळामध्ये कोणतीही वाढ होणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये कोहलीला कुंबळे यांच्या कार्यकाळाबाबत विचारण्यात आले. या वेळी कोहलीने म्हटले की, ‘जेव्हापासून मला कळायला लागले, तेव्हापासून माझ्या माहितीप्रमाणे मागील कित्येक वर्षांपासून याच प्रकारची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. गेल्या वेळीही हीच प्रक्रिया कायम ठेवण्यात आली होती. कार्यकाळ एका वर्षाचा होता आणि निश्चितच ही प्रक्रियाही तशीच असेल.’ (वृत्तसंस्था)हार्दिक पंड्या आणि केदार जाधव यांच्या संघातील समावेशामुळे फलंदाजीसाठी खालचा मध्यमक्रम मजबूत झाला आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीवर मॅच फिनिश करण्याचा दबाव कमी होणार आहे. आम्ही खालचा मध्यक्रम मजबूत करण्याच्या दृष्टीनेच हे बदल केले आहेत. आम्हाला वाटते की, गेल्या दोन वर्षांपासून महेंद्रसिंह धोनीवर खूप दबाव आला होता. धोनी स्वत:ला सिद्ध करू शकत नव्हता कारण असे संघात खेळाडू नव्हते की जे त्याच्याबरोबर मॅच फिनिश करण्याचा संयम दाखवू शकत होते, असेसुद्धा विराटने सांगितले.