शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मुंबई-कोलकाता यांच्यात आज वर्चस्वाची लढाई

By admin | Updated: May 13, 2017 02:02 IST

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दिग्गज संघात आज शनिवारी आयपीएल-१० मध्ये होणाऱ्या लढतीद्वारे पहिल्या दोन स्थानांसाठी

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दिग्गज संघात आज शनिवारी आयपीएल-१० मध्ये होणाऱ्या लढतीद्वारे पहिल्या दोन स्थानांसाठी फैसला होईल. शानदार सुरुवातीनंतर दोन्ही संघ विजयी पथावरून भटकले आहेत. मुंबईला सलग दोन सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले, तर केकेआर संघ तीन सामन्यात पराभूत झाला.प्ले आॅफ गाठणारा पहिला संघ मुंबईवर या सामन्यातील निकालाचा फारसा फरक पडणार नाही, पण केकेआर हा सामना जिंकून १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान होण्यासाठी धडपडत आहे. सध्या मुंबईचे १८ तर केकेआरचे १६ गुण आहेत. पहिल्या दोन स्थानांवर राहणाऱ्या संघांना फायनलसाठी दोन संधी मिळतील. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील निकालांवर नजर टाकल्यास मुंबईने केकेआरला आतापर्यंत सलग चार वेळा नमविले. दोन्ही संघाचा जयपराजयाचा रेकॉर्ड ४-१४ असा आहे. ज्या संघांनी अद्याप बाद फेरी गाठलेली नाही त्यात सर्वात प्रभावी धाव सरासरी (प्लस ०.७२९) केकेआरची आहे. पण अखेरपर्यंत न ताणता लवकर पात्रता गाठण्याची केकेआरला घाई झाली आहे. केकेआरला विजय मिळवायचा झाल्यास आघाडीच्या फलंदाजांवर विसंबून राहण्याची वृत्ती सोडावी लागेल. केकेआरची गोलंदाजी भक्कम असल्याने ही लढत मुंबईचे फलंदाज विरुद्ध केकेआरचे गोलंदाज अशी असेल. मुंबईचा कॅरेबियन स्टार लेंडल सिमन्स आणि किरोन पोलार्ड शानदार फॉर्ममध्ये आहेत. मागच्यावेळी मुंबईने केकेआरला दोन्ही सामन्यात पराभूत केले होते. दोन्ही सामन्यात कर्णधार रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला. रोहितपुढे उद्या स्थिरावून खेळण्याचे आव्हान असेल. पंजाबविरुध्दचा पराभव मागे टाकून मुंबई उद्या मैदानात उतरेल. (वृत्तसंस्था)आम्हाला घाबरण्याचीगरज नाही : पोलार्डप्ले आॅफमध्ये स्थान निश्चितीनंतर आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले तरी घाबरण्याची गरज नाही, असे या संघाचा फलंदाज विंडीजचा किरोन पोलार्ड याने म्हटले आहे. मुंबई संघ पंजाबकडून सात धावांनी पराभूत झाल्यानंतर पोलार्ड म्हणाला, ‘या पराभवामुळे आम्ही देखील माणसे आहोत आणि प्रत्येक सामना जिंकू शकत नाही, हे सिद्ध झाले. कामगिरीत सुधारणेची आम्हाला देखील गरज आहे. हैदराबादविरुद्ध खराब कामगिरी केली पण येथील चांगल्या विकेटवर आम्ही पंजाबविरुद्ध चांगला खेळ केला. चांगल्या संघांविरुद्धची लढत प्रत्येकवेळी जिंकू असे नाही. आमचे मनोबल कायम असल्याने प्ले आॅफमध्ये भीती बाळगण्याचे कारणनाही. पात्रता फेरी हे पहिले लक्ष्य असते. ते आम्ही गाठले. ज्या चुका झाल्या त्या सुधारून पुढील सामन्यात विजयमिळवू.’