शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

बलाढ्य भारताचे आव्हान पेलण्यास बांगलादेश सज्ज : मूर्तझा

By admin | Updated: May 22, 2015 00:48 IST

टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारताच्या बलाढ्य संघाचे आव्हान पेलण्यास बांगलादेश सज्ज असल्याचे मत या संघाचा कर्णधार मुशर्रफ मूर्तझा याने व्यक्त केले आहे.

ढाका : पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारताच्या बलाढ्य संघाचे आव्हान पेलण्यास बांगलादेश सज्ज असल्याचे मत या संघाचा कर्णधार मुशर्रफ मूर्तझा याने व्यक्त केले आहे.बीसीसीआयने बुधवारी विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी तसेच महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात वन डे संघाची घोषणा केली. या दौऱ्यात संपूर्ण ताकदीनिशी संघ पाठविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयामुळे सिनियर्सच्या विश्रांती घेण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. मूर्तझा म्हणाला, ‘भारताने भक्कम संघासह बांगलादेश दौरा करावा, अशी आम्हालादेखील अपेक्षा होती. सर्वच खेळाडू अव्वल दर्जाचे असल्याने भारतीय संघ आमच्यासाठी मोठे आव्हानच असेल. हे कडवे आव्हान पेलण्यास आम्ही सज्ज आहोत.’भारताने मार्च महिन्यात विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. मूर्तझा म्हणाला, ‘मोहम्मद शमीचा अपवाद वगळता दौऱ्यावर येणारा भारताचा संघ विश्वचषकासारखाच आहे. भारतीय फलंदाजी क्रम नंबर वन असल्याने आमच्या गोलंदाजांना मोठे आव्हान असेल.’ वेनवान गोलंदाज धवल कुलकर्णी याला शमीऐवजी संघात स्थान मिळाले. भारताने गतवर्षी देखील आयपीएल आटोपताच बांगलादेशचा दौरा केला होता. तीन वन डे सामन्यासाठी धोनी आणि कोहलीसह काही सिनियर्स खेळाडूंनी विश्रांती घेतली होती. सुरेश रैना संघाचा कर्णधार होता. भारताने ही मालिका २-० ने जिंकली; पण मूर्तझाने त्या वेळी दुय्यम संघ पाठविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर बरेच तोंडसुख घेतले होते.मूर्तझा म्हणाला, ‘बलाढ्य संघ दौऱ्यावर येत असेल तर अवांतर दडपण येते. यंदा मात्र आमच्यावर दडपण नाहीच. या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. भारताच्या याच संघाने विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळला होता, हे विसरून चालणार नाही.’ ७ जूनपासून सुरू होत असलेल्या या दौऱ्यात भारत एकमेव कसोटी सामना आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळेल. कसोटी १० जूनपासून सुरू होईल. वन डे सामन्यांचे आयोजन मीरपूर येथे १८, २१ आणि २४ जून रोजी होईल. (वृत्तसंस्था)