शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

बलाढ्य भारताचे आव्हान पेलण्यास बांगलादेश सज्ज : मूर्तझा

By admin | Updated: May 22, 2015 00:48 IST

टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारताच्या बलाढ्य संघाचे आव्हान पेलण्यास बांगलादेश सज्ज असल्याचे मत या संघाचा कर्णधार मुशर्रफ मूर्तझा याने व्यक्त केले आहे.

ढाका : पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारताच्या बलाढ्य संघाचे आव्हान पेलण्यास बांगलादेश सज्ज असल्याचे मत या संघाचा कर्णधार मुशर्रफ मूर्तझा याने व्यक्त केले आहे.बीसीसीआयने बुधवारी विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी तसेच महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात वन डे संघाची घोषणा केली. या दौऱ्यात संपूर्ण ताकदीनिशी संघ पाठविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयामुळे सिनियर्सच्या विश्रांती घेण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. मूर्तझा म्हणाला, ‘भारताने भक्कम संघासह बांगलादेश दौरा करावा, अशी आम्हालादेखील अपेक्षा होती. सर्वच खेळाडू अव्वल दर्जाचे असल्याने भारतीय संघ आमच्यासाठी मोठे आव्हानच असेल. हे कडवे आव्हान पेलण्यास आम्ही सज्ज आहोत.’भारताने मार्च महिन्यात विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. मूर्तझा म्हणाला, ‘मोहम्मद शमीचा अपवाद वगळता दौऱ्यावर येणारा भारताचा संघ विश्वचषकासारखाच आहे. भारतीय फलंदाजी क्रम नंबर वन असल्याने आमच्या गोलंदाजांना मोठे आव्हान असेल.’ वेनवान गोलंदाज धवल कुलकर्णी याला शमीऐवजी संघात स्थान मिळाले. भारताने गतवर्षी देखील आयपीएल आटोपताच बांगलादेशचा दौरा केला होता. तीन वन डे सामन्यासाठी धोनी आणि कोहलीसह काही सिनियर्स खेळाडूंनी विश्रांती घेतली होती. सुरेश रैना संघाचा कर्णधार होता. भारताने ही मालिका २-० ने जिंकली; पण मूर्तझाने त्या वेळी दुय्यम संघ पाठविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर बरेच तोंडसुख घेतले होते.मूर्तझा म्हणाला, ‘बलाढ्य संघ दौऱ्यावर येत असेल तर अवांतर दडपण येते. यंदा मात्र आमच्यावर दडपण नाहीच. या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. भारताच्या याच संघाने विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळला होता, हे विसरून चालणार नाही.’ ७ जूनपासून सुरू होत असलेल्या या दौऱ्यात भारत एकमेव कसोटी सामना आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळेल. कसोटी १० जूनपासून सुरू होईल. वन डे सामन्यांचे आयोजन मीरपूर येथे १८, २१ आणि २४ जून रोजी होईल. (वृत्तसंस्था)