शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अटीतटीच्या लढतीत बंगळुरूची बाजी

By admin | Updated: April 8, 2017 23:52 IST

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिसवर 15 धावांनी मात केली.

ऑनलाइन लोकमत 
बंगळुरू, दि. 8 -  शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिसवर 15 धावांनी मात केली. 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.  दिल्लीला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असताना एकाकी झुंज देणारा रिषभ पंत बाद झाला आणि दिल्लीचे लढतीतील आव्हान संपले. दिल्लीकडून रिषभ पंतचा (57) अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.  
तत्पूर्वी  कर्णधार झहीर खान आणि ख्रिस मॉरिस केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 157 धावांत रोखले. केदार जाधवचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या केदार जाधवच्या 67 धावांच्या जोरावर बंगळुरूने दीडशेपार मजल मारली.  
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर बंगळुरूला चांगली सुरुवात करता आली नाही. कर्णधार शेन वॉटसनचा सलामीला येण्याचा प्रयोगही यशस्वी ठरला नाही. ख्रिस गेल (6) लवकर माघारी परतल्यावर बंगळुरूच्या इतर फलंदाजांनीही निराशा केली. त्यामुळे संघाचे अर्धशतक फलकावर लागण्यासाठी आठव्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. 
त्यानंतर मात्र केदार जाधवने तुफान फटकेबाजी केली. त्याने अमित मिश्राच्या एका षटकात 24 धावा वसूल केल्या. त्यामुळे बंगळुरू समाधानकारक धावसंख्या उभारेल, असे वाटले. पण केदारला (67) धावांवर बाद करत झहीर खानने बंगळुरूच्या धावसंख्येला ब्रेक लावला. अखेरीस 20 षटकात बंगळुरूला आठ बाद 157 धावाच करता आल्या. दिल्लीकडून मॉरिसने तीन, तर झहीरने दोन बळी टिपले.