शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटनपटू सिंधूचे आता लक्ष्य ‘नंबर वन’चे...

By admin | Updated: December 23, 2016 01:23 IST

आॅलिम्पिकमध्ये यंदा मिळवलेले पदक माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे यश होते. हे पदक मिळवून मी माझे एक स्वप्न पूर्ण केले आहे

मुंबई : आॅलिम्पिकमध्ये यंदा मिळवलेले पदक माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे यश होते. हे पदक मिळवून मी माझे एक स्वप्न पूर्ण केले आहे. त्याचबरोबर मी माझ्या पहिल्या सुपरसीरिज विजेतेपदाच्या प्रतीक्षेत होते आणि यंदा ती प्रतीक्षाही संपली. त्यामुळे हीच कामगिरी कायम ठेवून जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी येण्याचे लक्ष्य मी बाळगले आहे, असा विश्वास भारताची आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केला.मुंबईत गुरुवारी एका नामांकित जीवन विमा कंपनीने आयोजित केलेल्या ‘क्वेस्ट फॉर एक्सलेन्स’ कार्यक्रमामध्ये सिंधूने आपली प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद, किदाम्बी श्रीकांत, पी. कश्यप, समीर वर्मा, सात्विक साईराज, एचएस प्रणय, सिक्कि रेड्डी, गुरुसाई दत्त, सौरव वर्मा आणि भारतीय संघाचे फिजिओ किरण यांचीही उपस्थिती होती. ताज्या जागतिक क्रमवारीनुसार सिंधूने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवताना ६ व्या क्रमांकावर कब्जा केला आहे. याविषयी ती म्हणाली, ‘मी या यशामुळे खूप आनंदीत आहे. भविष्यात नक्कीच अव्वलस्थान काबीज करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी मी हळूहळू पुढे जाणार असून एकावेळी एक लक्ष्य साध्य करीन. यात नक्की यशस्वी होईन, अशी आशा आहे.’यंदाचे वर्ष शानदार ठरल्याचे सांगताना सिंधू म्हणाली की, ‘नक्कीच, आॅलिम्पिक स्पर्धा चमकदार ठरली. याआधी अनेक जागतिक स्पर्धेत आपल्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळेच, यावेळी मला हा इतिहास कसंही करून बदलायचा होता. जपानच्या नोझोमी ओकुहारा (जपान) विरुद्ध यापूर्वी मी अनेकदा पराभूत झाले होते, पण यावेळी तिला सोडायचे नाही असा निर्धार करून सर्वोत्तम खेळ करत अंतिम फेरीत धडक मारली.’ तसेच, ‘आॅलिम्पिकचा उपांत्य सामना सोपा नव्हता. मी पिछाडीवर होते. माझ्यापेक्षा गोपी सरांना त्या सामन्याची स्थिती चांगली कळत होती. त्यामुळे मी केवळ त्यांच्या सूचनांचे पालन करत गेले,’ असेही सिंधूने यावेळी म्हटले. नुकत्याच झालेल्या दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेबाबत सिंधूने सांगितले की, ‘सुंग जी ह्यूनला नमवून मी चायना ओपनमध्ये बाजी मारली होती. परंतु, दुबईला ती अप्रतिम खेळली. शेवट जय-पराजय हा खेळाचा एक भाग असल्याने हे सर्व विसरुन मी पुढील कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे.’ (क्रीडा प्रतिनिधी)