शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
4
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
5
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
7
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
8
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
9
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
10
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
11
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
12
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
13
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
14
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
15
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
16
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
17
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
18
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
19
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
20
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

बॅडमिंटनपटू सिंधूचे आता लक्ष्य ‘नंबर वन’चे...

By admin | Updated: December 23, 2016 01:23 IST

आॅलिम्पिकमध्ये यंदा मिळवलेले पदक माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे यश होते. हे पदक मिळवून मी माझे एक स्वप्न पूर्ण केले आहे

मुंबई : आॅलिम्पिकमध्ये यंदा मिळवलेले पदक माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे यश होते. हे पदक मिळवून मी माझे एक स्वप्न पूर्ण केले आहे. त्याचबरोबर मी माझ्या पहिल्या सुपरसीरिज विजेतेपदाच्या प्रतीक्षेत होते आणि यंदा ती प्रतीक्षाही संपली. त्यामुळे हीच कामगिरी कायम ठेवून जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी येण्याचे लक्ष्य मी बाळगले आहे, असा विश्वास भारताची आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केला.मुंबईत गुरुवारी एका नामांकित जीवन विमा कंपनीने आयोजित केलेल्या ‘क्वेस्ट फॉर एक्सलेन्स’ कार्यक्रमामध्ये सिंधूने आपली प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद, किदाम्बी श्रीकांत, पी. कश्यप, समीर वर्मा, सात्विक साईराज, एचएस प्रणय, सिक्कि रेड्डी, गुरुसाई दत्त, सौरव वर्मा आणि भारतीय संघाचे फिजिओ किरण यांचीही उपस्थिती होती. ताज्या जागतिक क्रमवारीनुसार सिंधूने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवताना ६ व्या क्रमांकावर कब्जा केला आहे. याविषयी ती म्हणाली, ‘मी या यशामुळे खूप आनंदीत आहे. भविष्यात नक्कीच अव्वलस्थान काबीज करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी मी हळूहळू पुढे जाणार असून एकावेळी एक लक्ष्य साध्य करीन. यात नक्की यशस्वी होईन, अशी आशा आहे.’यंदाचे वर्ष शानदार ठरल्याचे सांगताना सिंधू म्हणाली की, ‘नक्कीच, आॅलिम्पिक स्पर्धा चमकदार ठरली. याआधी अनेक जागतिक स्पर्धेत आपल्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळेच, यावेळी मला हा इतिहास कसंही करून बदलायचा होता. जपानच्या नोझोमी ओकुहारा (जपान) विरुद्ध यापूर्वी मी अनेकदा पराभूत झाले होते, पण यावेळी तिला सोडायचे नाही असा निर्धार करून सर्वोत्तम खेळ करत अंतिम फेरीत धडक मारली.’ तसेच, ‘आॅलिम्पिकचा उपांत्य सामना सोपा नव्हता. मी पिछाडीवर होते. माझ्यापेक्षा गोपी सरांना त्या सामन्याची स्थिती चांगली कळत होती. त्यामुळे मी केवळ त्यांच्या सूचनांचे पालन करत गेले,’ असेही सिंधूने यावेळी म्हटले. नुकत्याच झालेल्या दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेबाबत सिंधूने सांगितले की, ‘सुंग जी ह्यूनला नमवून मी चायना ओपनमध्ये बाजी मारली होती. परंतु, दुबईला ती अप्रतिम खेळली. शेवट जय-पराजय हा खेळाचा एक भाग असल्याने हे सर्व विसरुन मी पुढील कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे.’ (क्रीडा प्रतिनिधी)