शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, रेनशॉ पाठोपाठ मार्श स्वस्तात बाद

By admin | Updated: March 16, 2017 11:19 IST

रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. 16 - रेनशॉ पाठोपाठ शॉन मार्शही स्वस्तात माघारी परतला आहे. मार्शला अवघ्या (2) धावांवर अश्विनने पूजाराकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 89 झाली आहे.  सलामीवीर मॅट रेन शॉ (44) धावांवर बाद झाला. 80 धावांवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट गेली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर रेन शॉ ने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलीकडे सोपा झेल दिला. आता कर्णधार स्मिथची (15) साथ द्यायला हँडस्काँब मैदानावर आला आहे. सलामीवीर डेविड वॉर्नरला डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजाने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्याने (19) धावा केल्या. 50 धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट गेली. 
 
रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरी कसोटी भारताने जिंकली होती. दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने पंचांच्या निर्णयावर डीआरएस घेताना पॅव्हेलियनकडे मदत मागितल्याचे प्रकरण बरेच गाजले. 
 
कर्णधार विराट कोहलीने या प्रकारावर जोरदार टीका केल्याने दोन्ही संघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे तिस-या कसोटीत खेळताना दोन्ही संघात ठसन दिसू शकते.  कसोटी मालिकेत खेळपट्टी रोमांच निर्माण करीत आहे.पुण्यातील पहिल्या कसोटीसाठी असलेली खेळपट्टी खराब, तर बंगळुरूमधील दुसऱ्या कसोटीची खेळपट्टीदेखील साधारण असल्याचा निष्कर्ष मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी काढला होता. 
 
बंगळुरूत भारताने माघारल्यानंतरही मुसंडी मारून विजय साकार केल्याने आत्मविश्वास उंचावला. तिसऱ्या सामन्याच्या निमित्ताने दोन्ही संघांच्या चिंतेचा विषय खेळपट्टी आहे. ही खळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जाते; पण स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र पाच दिवस एकसारखेच स्वरूप राहील, असे भाकीत केले.
 
मालिकेवर लक्ष केंद्रित करणार : कोहली
बंगळुरूत जे झाले, ते विसरून आता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. बरेच क्रिकेट शिल्लक असल्याने कटुता ठेवता येणार नाही. आमचे क्रिकेटला प्राधान्य असेल. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी मला काय म्हटले, त्याबद्दल खेद नाही. आता पुढे पाहायचेय. मी जे बोलतो, त्याबद्दलच विचार करतो. सामन्यादरम्यान बराच ब्रेक मिळाल्याने एकाच मुद्द्यावर वेळ घालविण्यापेक्षा पुढचा विचार कधीही चांगलाच. आयसीसीच्या हस्तक्षेपानंतर वादावर दोन्ही बोर्डांनी चांगली भूमिका घेतल्याचा आनंद आहे. मला टार्गेट करण्यात आले, त्यावर काहीच बोलायचे नाही. टीकेचे लक्ष्य होण्याचे टाळून कुणीही १५-१६ वर्षे क्रिकेट खेळू शकत नाही. ही मालिका मात्र वैयक्तिक स्पर्धा करण्याची नाहीच. आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवून डावपेच आखतो.