शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, रेनशॉ पाठोपाठ मार्श स्वस्तात बाद

By admin | Updated: March 16, 2017 11:19 IST

रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. 16 - रेनशॉ पाठोपाठ शॉन मार्शही स्वस्तात माघारी परतला आहे. मार्शला अवघ्या (2) धावांवर अश्विनने पूजाराकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 89 झाली आहे.  सलामीवीर मॅट रेन शॉ (44) धावांवर बाद झाला. 80 धावांवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट गेली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर रेन शॉ ने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलीकडे सोपा झेल दिला. आता कर्णधार स्मिथची (15) साथ द्यायला हँडस्काँब मैदानावर आला आहे. सलामीवीर डेविड वॉर्नरला डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजाने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्याने (19) धावा केल्या. 50 धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट गेली. 
 
रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरी कसोटी भारताने जिंकली होती. दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने पंचांच्या निर्णयावर डीआरएस घेताना पॅव्हेलियनकडे मदत मागितल्याचे प्रकरण बरेच गाजले. 
 
कर्णधार विराट कोहलीने या प्रकारावर जोरदार टीका केल्याने दोन्ही संघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे तिस-या कसोटीत खेळताना दोन्ही संघात ठसन दिसू शकते.  कसोटी मालिकेत खेळपट्टी रोमांच निर्माण करीत आहे.पुण्यातील पहिल्या कसोटीसाठी असलेली खेळपट्टी खराब, तर बंगळुरूमधील दुसऱ्या कसोटीची खेळपट्टीदेखील साधारण असल्याचा निष्कर्ष मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी काढला होता. 
 
बंगळुरूत भारताने माघारल्यानंतरही मुसंडी मारून विजय साकार केल्याने आत्मविश्वास उंचावला. तिसऱ्या सामन्याच्या निमित्ताने दोन्ही संघांच्या चिंतेचा विषय खेळपट्टी आहे. ही खळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जाते; पण स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र पाच दिवस एकसारखेच स्वरूप राहील, असे भाकीत केले.
 
मालिकेवर लक्ष केंद्रित करणार : कोहली
बंगळुरूत जे झाले, ते विसरून आता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. बरेच क्रिकेट शिल्लक असल्याने कटुता ठेवता येणार नाही. आमचे क्रिकेटला प्राधान्य असेल. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी मला काय म्हटले, त्याबद्दल खेद नाही. आता पुढे पाहायचेय. मी जे बोलतो, त्याबद्दलच विचार करतो. सामन्यादरम्यान बराच ब्रेक मिळाल्याने एकाच मुद्द्यावर वेळ घालविण्यापेक्षा पुढचा विचार कधीही चांगलाच. आयसीसीच्या हस्तक्षेपानंतर वादावर दोन्ही बोर्डांनी चांगली भूमिका घेतल्याचा आनंद आहे. मला टार्गेट करण्यात आले, त्यावर काहीच बोलायचे नाही. टीकेचे लक्ष्य होण्याचे टाळून कुणीही १५-१६ वर्षे क्रिकेट खेळू शकत नाही. ही मालिका मात्र वैयक्तिक स्पर्धा करण्याची नाहीच. आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवून डावपेच आखतो.