शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, रेनशॉ पाठोपाठ मार्श स्वस्तात बाद

By admin | Updated: March 16, 2017 11:19 IST

रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. 16 - रेनशॉ पाठोपाठ शॉन मार्शही स्वस्तात माघारी परतला आहे. मार्शला अवघ्या (2) धावांवर अश्विनने पूजाराकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 89 झाली आहे.  सलामीवीर मॅट रेन शॉ (44) धावांवर बाद झाला. 80 धावांवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट गेली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर रेन शॉ ने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलीकडे सोपा झेल दिला. आता कर्णधार स्मिथची (15) साथ द्यायला हँडस्काँब मैदानावर आला आहे. सलामीवीर डेविड वॉर्नरला डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजाने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्याने (19) धावा केल्या. 50 धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट गेली. 
 
रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरी कसोटी भारताने जिंकली होती. दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने पंचांच्या निर्णयावर डीआरएस घेताना पॅव्हेलियनकडे मदत मागितल्याचे प्रकरण बरेच गाजले. 
 
कर्णधार विराट कोहलीने या प्रकारावर जोरदार टीका केल्याने दोन्ही संघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे तिस-या कसोटीत खेळताना दोन्ही संघात ठसन दिसू शकते.  कसोटी मालिकेत खेळपट्टी रोमांच निर्माण करीत आहे.पुण्यातील पहिल्या कसोटीसाठी असलेली खेळपट्टी खराब, तर बंगळुरूमधील दुसऱ्या कसोटीची खेळपट्टीदेखील साधारण असल्याचा निष्कर्ष मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी काढला होता. 
 
बंगळुरूत भारताने माघारल्यानंतरही मुसंडी मारून विजय साकार केल्याने आत्मविश्वास उंचावला. तिसऱ्या सामन्याच्या निमित्ताने दोन्ही संघांच्या चिंतेचा विषय खेळपट्टी आहे. ही खळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जाते; पण स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र पाच दिवस एकसारखेच स्वरूप राहील, असे भाकीत केले.
 
मालिकेवर लक्ष केंद्रित करणार : कोहली
बंगळुरूत जे झाले, ते विसरून आता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. बरेच क्रिकेट शिल्लक असल्याने कटुता ठेवता येणार नाही. आमचे क्रिकेटला प्राधान्य असेल. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी मला काय म्हटले, त्याबद्दल खेद नाही. आता पुढे पाहायचेय. मी जे बोलतो, त्याबद्दलच विचार करतो. सामन्यादरम्यान बराच ब्रेक मिळाल्याने एकाच मुद्द्यावर वेळ घालविण्यापेक्षा पुढचा विचार कधीही चांगलाच. आयसीसीच्या हस्तक्षेपानंतर वादावर दोन्ही बोर्डांनी चांगली भूमिका घेतल्याचा आनंद आहे. मला टार्गेट करण्यात आले, त्यावर काहीच बोलायचे नाही. टीकेचे लक्ष्य होण्याचे टाळून कुणीही १५-१६ वर्षे क्रिकेट खेळू शकत नाही. ही मालिका मात्र वैयक्तिक स्पर्धा करण्याची नाहीच. आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवून डावपेच आखतो.