शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

ऑस्ट्रेलियाचा डाव संपला, भारत विजयाची गुढी उभारणार

By admin | Updated: March 27, 2017 20:40 IST

चौथ्या कसोटीत दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ 137 धावात ढेर झाला. भारताने पहिल्या डावात 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली होती

ऑनलाइन लोकमतधर्मशाळा, दि. 27 - चौथ्या कसोटीत दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ 137 धावात ढेर झाला. भारताने पहिल्या डावात 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली होती. भारताला विजयासाठी 106 धावांची लक्ष्य आहे. चार सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. चौथा कसोटी सामना जिंकून भारत विजयाची गुढी उभारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताकडे फलंदाजीसाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने बिनबाद 19 धावा केल्या असून भारताला विजयासाठी अजून 87 धावांची आवश्यकता आहेभारताने आज सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. वॉर्नर-रेनशॉ जोडीने संथ सुरुवात केली. पण भुवनेश्वर-यादव जोडीने कांगारुंची शिकार केली. या जोडीने योग्य टप्प्यावर मारा करत कांगारूंना बाद केले. उमेश यादवने वॉर्नर-रेनशॉ यांना बाद करत ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला. वॉर्नर 6 आणि रेनशो 8 धावांवर बाद झाला. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथही आज अपयशी ठरला. भुवनेश्वरने स्मिथच्या दांड्या वाकवत भारताला मोठं यश मिळवून दिले. पहिल्या डावात चार बळी घेणाऱ्या कुलदीपला दुसऱ्या डावात एकही बळी घेता आला नाही. भारताकडून यादव, जाडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 3-3 असे बळी घेतले आहेत. तर भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने 45 धावांची खेळी केली आहे. तर वेड 25 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ 17 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना 10चा आकडाही पार करता आला नाही. कालच्या ६ बाद २४८ धावांवरून भारताने आज खेळाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या साहा-जाडेजाच्या जोडीने तिसऱ्या दिवशी आक्रमक खेळ केला. जाडेजाने चौफेर फटकेबाजी करताना 63 धावांची खेळी केली. या विस्फोटक खेळीदरम्यान त्याने चार चौकार आणि चार षटकार लगावले. जाडेजा बाद झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीची पडझड झाली आणि भारताचा डाव 332 धावांवर संपुष्टात आला. साहाने 31 धावांची संयमी फलंदाजी करताना जाडेजाला उत्तम साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायने सर्वाधिक पाच बळी घेतले तर कमिन्सने 3 गडी बाद केले.