शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

रांचीतील पिचने वाढवली ऑस्ट्रेलियाची चिंता

By admin | Updated: March 14, 2017 12:47 IST

बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे गुरुवारपासून होणाऱ्या रांची कसोटीला महत्त्व आले आहे. मात्र या कसोटीपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघात चिंतेचे वातावरण

ऑनलाइन लोकमतरांची, दि. 14 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे गुरुवारपासून होणाऱ्या रांची कसोटीला महत्त्व आले आहे. मात्र या कसोटीपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या चिंतेचे कारण भारताचे फलंदाज वा गोलंदाज नसून रांचीतील खेळपट्टी आहे.मालिकेतील याआधीचे दोन कसोटी सामने खेळवण्यात आलेल्या पुणे आणि बंगळुरूतील खेळपट्ट्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यातल्या त्यात बंगळुरूची खेळपट्टी बरी असल्याने तेथील सामना चार दिवस चालला. पण पुण्यातील कसोटी अडीच दिवसांतच आटोपली होती. आता तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणारी रांचीतील खेळपट्टी पुण्याहून अधिक फिरकीला साथ देणारी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

( विराटसेना 'बंगळुरू टेस्ट'मध्ये पास! पण...) रांचीच्या खेळपट्टीवर चेंडूला पुण्यापेक्षा अधिक फिरकी मिळेल, अशी शंका ऑस्ट्रेलियन संघाला आहे. सिडनी मॉर्निंग हेरॉल्डने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. भारताचा अव्वल फिरकीपटी रवीचंद्रन अश्विनची गोलंदाजी डोळ्यासमोर ठेवून ही खेळपट्टी तयार करण्यात आल्याचा ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाचा अंदाज आहे. तसेच खेळपट्टीवरून चेंडूला मिळणाऱ्या उसळीबाबतही ऑस्ट्रेलियाला चिंता आहे.