शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

रांचीतील पिचने वाढवली ऑस्ट्रेलियाची चिंता

By admin | Updated: March 14, 2017 12:47 IST

बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे गुरुवारपासून होणाऱ्या रांची कसोटीला महत्त्व आले आहे. मात्र या कसोटीपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघात चिंतेचे वातावरण

ऑनलाइन लोकमतरांची, दि. 14 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे गुरुवारपासून होणाऱ्या रांची कसोटीला महत्त्व आले आहे. मात्र या कसोटीपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या चिंतेचे कारण भारताचे फलंदाज वा गोलंदाज नसून रांचीतील खेळपट्टी आहे.मालिकेतील याआधीचे दोन कसोटी सामने खेळवण्यात आलेल्या पुणे आणि बंगळुरूतील खेळपट्ट्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यातल्या त्यात बंगळुरूची खेळपट्टी बरी असल्याने तेथील सामना चार दिवस चालला. पण पुण्यातील कसोटी अडीच दिवसांतच आटोपली होती. आता तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणारी रांचीतील खेळपट्टी पुण्याहून अधिक फिरकीला साथ देणारी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

( विराटसेना 'बंगळुरू टेस्ट'मध्ये पास! पण...) रांचीच्या खेळपट्टीवर चेंडूला पुण्यापेक्षा अधिक फिरकी मिळेल, अशी शंका ऑस्ट्रेलियन संघाला आहे. सिडनी मॉर्निंग हेरॉल्डने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. भारताचा अव्वल फिरकीपटी रवीचंद्रन अश्विनची गोलंदाजी डोळ्यासमोर ठेवून ही खेळपट्टी तयार करण्यात आल्याचा ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाचा अंदाज आहे. तसेच खेळपट्टीवरून चेंडूला मिळणाऱ्या उसळीबाबतही ऑस्ट्रेलियाला चिंता आहे.