शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

आॅस्ट्रेलियन मीडियाने केली स्मिथची प्रशंसा

By admin | Updated: February 26, 2017 23:49 IST

भारतात १३ वर्षांत प्रथमच कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या आॅस्ट्रेलियन संघावर आॅस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी स्तुतिसुमने उधळली.

मेलबोर्न : भारतात १३ वर्षांत प्रथमच कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या आॅस्ट्रेलियन संघावर आॅस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी स्तुतिसुमने उधळली. स्टीव्ह स्मिथ एका दशकापेक्षा अधिक कालावधीनंतर आॅस्ट्रेलियन संघाला मालिका विजय मिळवून देण्यात सक्षम असल्याचे आॅस्ट्रेलियन मीडियाने म्हटले आहे. डावखुरा फिरकीपटू स्टीव्ह ओकिफीच्या चमकदार कामगिरीची प्रशंसा करण्यात आली. ओकिफीच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने तीन दिवसांमध्ये ३३३ धावांनी शानदार विजय नोंदवला. ‘द आॅस्ट्रेलियन’ वृत्तपत्राने लिहिले की, ‘इतिहास रचला’, आॅस्ट्रेलियाने जवळजवळ १३ वर्षांनंतर भारतात पहिला कसोटी विजय साकारला. स्टीव्ह ओकिफीने सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून आपली दखल घेण्यास भाग पाडले. भारत स्तब्ध झाला. एक अब्ज भारतीयांना अशा निकालाची अपेक्षा नव्हती. दोन कोटी आॅस्ट्रेलियन मात्र असा विचार करीत होते. आॅस्ट्रेलियन लोकांव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाला स्टीव्ह स्मिथच्या संघाकडून अशी अपेक्षा नव्हती. सर्वोत्तम कामगिरी. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतावर वर्चस्व गाजवले ’आॅस्ट्रेलियाने २००४ नंतर भारतात हा पहिला कसोटी विजय नोंदवला. त्याचसोबत त्यांनी यजमान संघाची सलग १९ सामन्यांत अपराजित राहण्याची मालिका खंडित केली. ‘सन हेराल्ड’मध्ये सामन्यात १२ बळी घेणारा ओकीफी व शतक झळकावणारा कर्णधार स्मिथ यांची प्रशंसा केली आहे. या वृत्तपत्रात म्हटले आहे की, ‘स्टीव्ह ओकिफीने विक्रमी कामगिरी करताना भारतात आॅस्ट्रेलिया संघाला सर्वोत्तम विजय मिळवून दिला. यजमान संघाला तीन दिवसांत पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. (वृत्तसंस्था)