शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने मागितली माफी

By admin | Updated: March 28, 2017 12:47 IST

स्टीव्ह स्मिथने तीन कसोटी शतकांसह 499 धावा केल्या. या मालिकेतील तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

 ऑनलाइन लोकमत 

धरमशाला, दि. 28 - चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भावनांवर नियंत्रण ठेवता न आल्याबद्दल ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने माफी मागितली आहे. सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरणाच्यावेळी बोलताना स्मिथने आपली चूक मान्य केली. मालिका सुरु असताना मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याबद्दल मी माफी मागतो असे स्मिथ म्हणाला. 
 
भारताने मंगळवारी शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर आठ विकेटने विजय मिळवून मालिका 2-1ने जिंकली. कर्णधार या नात्याने स्मिथने या दौ-यात उत्तम कामगिरी केली. त्याने तीन कसोटी शतकांसह 499 धावा केल्या. या मालिकेतील तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. माझ्या करीयरमधील ही उत्तम मालिका आहे. ज्या पद्धतीने आम्ही इथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आणि भारतीयांना आव्हान दिले ते सर्व विलक्षण होते असे 27 वर्षीय स्मिथ म्हणाला. 
 
भारत-ऑस्ट्रेलियामधील ही चार कसोटी सामन्यांची मालिका प्रत्यक्ष मैदानावरील क्रिकेटपेक्षा शाब्दीक वादावादीसाठी जास्त लक्षात राहिली. बंगळुरुच्या दुस-या कसोटीतील डीआरएसचा वाद प्रचंड गाजला. कर्णधार स्मिथने डीआरएसचा कौल घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन ड्रेंसिग रुमकडे मागितलेल्या मदतीवर कर्णधार विराट कोहलीने जोरदार टीका केली. 
 
स्मिथनेही नंतर आपली चूक मान्य केली. पण दोन्ही संघातील वातावरण इतके तापले होते कि, रांचीच्या तिस-या कसोटीत मैदानावर या वादाचे पडसाद उमटू नये यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी परस्परांची भेट घेऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.