शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
3
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
4
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
5
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
6
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
7
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
8
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
9
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
10
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
11
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
12
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
13
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
14
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
15
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
16
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
17
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
18
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
19
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
20
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर लक्ष

By admin | Updated: February 14, 2017 00:16 IST

खेळाडूंचे लक्ष पूर्वीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

हैदराबाद : खेळाडूंचे लक्ष पूर्वीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. बांगलादेशविरुद्ध सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी विजय मिळविल्यानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला पुणे येथे २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. कोहली म्हणाला, ‘भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. यंदाच्या मोसमात इंग्लंडविरुद्धची मालिका मोठी होती. त्यात आम्ही ४-० ने सरशी साधली. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहोत. आमचे प्रत्येकाचे लक्ष आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर गोलंदाजांच्या कामगिरीची प्रशंसा करताना कोहली म्हणाला, ‘ही खेळपट्टी निश्चितच फलंदाजीसाठी अनुकूल होती. नाणेफेक जिंंकल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. बांगलादेशने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. आम्ही योजनेनुसार खेळ करण्यास प्रयत्नशील होतो. आम्हाला आता मोठी मालिका खेळायची असून, गोलंदाजांना सूर गवसला आहे. एकूण विचार करता आमच्यासाठी ही लढत सकारात्मक ठरली.’ कोहली पुढे म्हणाला, ‘गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करण्याची पद्धत शोधून काढली. त्यामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. ईशांतचा स्पेल शानदार होता. जर संघात दोन जागतिक दर्जाचे फिरकीपटू असतील तर तुम्ही वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवू शकता. वेगवान गोलंदाज व फिरकीपटू यांच्यादरम्यानची भागीदारी शानदार होती. उमेश खरेच चांगली गोलंदाजी करीत आहे.’ (वृत्तसंस्था)