शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर लक्ष

By admin | Updated: February 14, 2017 00:16 IST

खेळाडूंचे लक्ष पूर्वीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

हैदराबाद : खेळाडूंचे लक्ष पूर्वीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. बांगलादेशविरुद्ध सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी विजय मिळविल्यानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला पुणे येथे २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. कोहली म्हणाला, ‘भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. यंदाच्या मोसमात इंग्लंडविरुद्धची मालिका मोठी होती. त्यात आम्ही ४-० ने सरशी साधली. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहोत. आमचे प्रत्येकाचे लक्ष आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर गोलंदाजांच्या कामगिरीची प्रशंसा करताना कोहली म्हणाला, ‘ही खेळपट्टी निश्चितच फलंदाजीसाठी अनुकूल होती. नाणेफेक जिंंकल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. बांगलादेशने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. आम्ही योजनेनुसार खेळ करण्यास प्रयत्नशील होतो. आम्हाला आता मोठी मालिका खेळायची असून, गोलंदाजांना सूर गवसला आहे. एकूण विचार करता आमच्यासाठी ही लढत सकारात्मक ठरली.’ कोहली पुढे म्हणाला, ‘गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करण्याची पद्धत शोधून काढली. त्यामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. ईशांतचा स्पेल शानदार होता. जर संघात दोन जागतिक दर्जाचे फिरकीपटू असतील तर तुम्ही वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवू शकता. वेगवान गोलंदाज व फिरकीपटू यांच्यादरम्यानची भागीदारी शानदार होती. उमेश खरेच चांगली गोलंदाजी करीत आहे.’ (वृत्तसंस्था)