शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तिरंदाजीत अतानू दासचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

By admin | Updated: August 10, 2016 06:47 IST

सामना जिंकण्यासाठी अतानूला आपल्या शेवटच्या प्रयत्नात १० गुणांची कमाई करून देणारा अचूक वेध हवा होता. अतानूने या क्षणी कोणताही दबाव निर्माण न होऊ देता अचूक लक्ष्यवेध साधला आणि सामना जिंकला.

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. १० :भारतीय तिरंदाज अतानू दासने रिओ ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या वैयक्तिक गटात संघर्षपूर्ण विजय प्राप्त करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अतानूने मोक्याच्या क्षणी उल्लेखनीय कामगिरी उंचावत क्यूबाच्या प्युएनतिस पेरेझ आद्रियन आंद्रेस याला पाच सेटच्या चुरशीच्या लढाईत ३-२ असे पराभूत केले. सामन्याच्या अखेरच्या दोन निर्णायक सेटमध्ये अतानूने अचूक लक्ष्यवेध साधून मात केली.

अतानूने सुरूवातीचे दोन सेट जिंकून आघाडी घेतली होती. पण पुढील दोन सेट अतानूने एका गुणाच्या फरकाने गमावले होते. पाचव्या सेटच्या पहिल्याच प्रयत्नात आंद्रेस याने ९ गुण कमावले. त्यानंतर अतानूने दुसऱ्या प्रयत्नात अचून लक्ष्यवेध साधून १० गुण पटकावले. त्यामुळे अतानूला प्रतिस्पर्धी खेळाडूवर दडपण आणता आले.

अटीतटीच्या लढतीत आंद्रेसनेही दमदार प्रत्युत्तर देत पुढच्याच प्रयत्नात ९ गुणांची कमाई केली. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी अतानूला आपल्या शेवटच्या प्रयत्नात १० गुणांची कमाई करून देणारा अचूक वेध हवा होता. अतानूने या क्षणी कोणताही दबाव निर्माण न होऊ देता अचूक लक्ष्यवेध साधला आणि सामना जिंकला.