शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

एशियन बीच गेम्सचे यजमानपद नाकारले, गोवा सरकारचा ‘यू टर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:55 IST

जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या असलेल्या आकर्षणामुळे २०२०मध्ये होणा-या ‘एशियन बीच गेम्स’ स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल करण्यात आले होते. गोव्यानेही त्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर ‘आयओए’नी ही संधी मिळवून दिली होती.

- सचिन कोरडेपणजी : जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या असलेल्या आकर्षणामुळे २०२०मध्ये होणा-या ‘एशियन बीच गेम्स’ स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल करण्यात आले होते. गोव्यानेही त्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर ‘आयओए’नी ही संधी मिळवून दिली होती. मात्र, आता सरकारी अनास्थेपोटी ही स्पर्धा गोव्याने गमावली असून काही कारणास्तव आम्ही ही स्पर्धा आयोजित करू शकत नसल्याचे कारण पुढे करीत गोवा सरकारने भारतीय आॅलिम्पिक संघटनेला (आयओए) पत्र पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनीदिली. त्यामुळे आता ही स्पर्धागोव्यात होणार नाही, हे निश्चित झाले आहे.गोवा सरकारने ‘आयओए’ला पत्र पाठवून ही स्पर्धा दुसरीकडे खेळविण्याची विनंती केली आहे. स्पर्धेसाठी आयओएकडे मुंबई, चेन्नई आणि केरळचे पर्याय होते. मात्र, गोवा सरकारच्या उत्साहामुळे आयओएचा गोव्यावर भर होता. आयओएच्या बैठकीत त्यास मंजुरी दिली गेली होती. त्यानंतर गोवा सरकारही सकारात्मक होते. स्पर्धेची तारीख निश्चित करण्यासाठी चर्चाही सुरू झाली असताना गोवा सरकारने अचानक यू टर्न घेतला आणि आपण हीस्पर्धा आयोजित करू शकतनसल्याचे पत्र आयओएलापाठवले.बत्रांनी केले होते शिक्कामोर्तबगोव्याने यजमानपदासाठी आयओएकडे पत्र पाठविले होते. आयओएचे अध्यक्ष नरींदर बत्रा आणि नवनियुक्त सचिव राजीव मेहता यांनी कार्यभार स्वीकारताच पहिली बैठक दिल्लीत घेतली. त्या बैठकीत २०२०मध्ये होणाºया एशियन बीच गेम्स आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांवर चर्चा झाली होती. आशियाई बीच गेम्स गोव्यात व्हाव्यात, अशी प्राथमिकता आयओएची होती. यापूर्वी स्पर्धा स्थळांवर चर्चासुद्धा झाली होती. त्यात मुंबईनंतर गोव्याचे नाव आघाडीवर होते. देश-विदेशातील खेळाडू गोव्यात येण्यास उत्सुक आहेत. गोव्यात बीच गेम्ससाठी साधनसुविधा आणि पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्याला मंजुरी देण्यात आली होती, असे एका पदाधिकाºयाने सांगितले.क्रीडा आणि पर्यटनालाही होता वाव...ही स्पर्धा ‘आॅलिम्पिक काउंसिल आॅफ एशिया’ आयोजित करते. याआधी, ही स्पर्धा व्हिएतनामने आयोजित केली होती. त्यात ४१ आशियाई संघांच्या एकूण २ हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. पहिली स्पर्धा बाली येथे २००८मध्ये झाली होती. एवढ्या मोठ्या स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्याची संधी गोव्याला प्रथमच मिळणार होती. या स्पर्धेमुळे गोव्याला क्रीडा क्षेत्रासह पर्यटनातही मोठा वाव होता. जगभरातील खेळाडू यानिमित्त गोव्यात आले असते. विशेष म्हणजे, सध्या क्रीडा आणि पर्यटन ही दोन्ही खाती मनोहर आजगावकर यांच्याकडेच आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा